शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

खरीप पिकांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:11 IST

पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील ३३ टक्के पाणी उपलब्ध असलेल्या लघु तलावांमधून खरीप हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

नाशिक : पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील ३३ टक्के पाणी उपलब्ध असलेल्या लघु तलावांमधून खरीप हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  प्रवाही, उपसा किंवा ठिबक पद्धतीने खरीप हंगामात विहीर पाण्याची सोय असलेल्या बारमाही उभ्या पिकांना मर्यादित क्षेत्रास शेती सिंचनासाठी लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्यांनी आपले पाणी अर्ज मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत संबंधित शाखा कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.  धरणांत उपलब्ध होणाऱ्या नवीन पाणी साठ्याबाबत शासन व वरिष्ठ कार्यालयाच्या निर्णयाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करताना पाऊस कमी झाल्यास धरणातील पाणी साठा कमी झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासली तर अशा वेळी दिलेला परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकसानभरपाई अथवा न्यायालयात दावा दाखल करता येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील लघु प्रकल्पांमधून उपलब्ध होणाºया पाण्यात तेलबिया व चारा पिकास प्राधान्य देण्यात येणार असून ही मंजुरी पाण्याची उपलब्धता विचारात घेऊनच देण्यात येणार आहे.अवैध उपसा करणा-यांवर कारवाईचा इशाराकालवा, जलाशय व नदी यावरील मंजूर उपसाधारकांव्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रिक मोटारी अथवा आॅइल इंजिन ठेवून अथवा पाइपलाइनद्वारे व डोंगळा पाइपद्वारे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याचे स्थानिक अधिकारी यांचे निदर्शनास येताच सिंचन अधिनियम संबंधिताची इलेक्ट्रिक मोटार, आॅइल इंजिन व तत्संबंधित साहित्यावर जप्ती करण्यासह पोलीस फिर्याद दाखल करण्याचा इशारा देतानाच कुणीही विना परवानगी पाणी वापर करू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे.उच्च न्यायालयात जायकवाडी धरणासाठी पाणी सोडणेबाबत जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन निर्णयानुसार अथवा शासन निर्णयानुसार आवर्तन देणेबाबत कार्यवाही होणार आहे. तसेच सिंचन पुरवठ्यासाठी केवळ खरिपाचे मागणी क्षेत्र मागविण्यात येत आहे. आवर्तन कालावधी अथवा कालव्यातून पाणी सोडणेबाबत शासन अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर कालवा सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती