शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

खरीप पिकांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:11 IST

पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील ३३ टक्के पाणी उपलब्ध असलेल्या लघु तलावांमधून खरीप हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

नाशिक : पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील ३३ टक्के पाणी उपलब्ध असलेल्या लघु तलावांमधून खरीप हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  प्रवाही, उपसा किंवा ठिबक पद्धतीने खरीप हंगामात विहीर पाण्याची सोय असलेल्या बारमाही उभ्या पिकांना मर्यादित क्षेत्रास शेती सिंचनासाठी लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्यांनी आपले पाणी अर्ज मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत संबंधित शाखा कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.  धरणांत उपलब्ध होणाऱ्या नवीन पाणी साठ्याबाबत शासन व वरिष्ठ कार्यालयाच्या निर्णयाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करताना पाऊस कमी झाल्यास धरणातील पाणी साठा कमी झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासली तर अशा वेळी दिलेला परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकसानभरपाई अथवा न्यायालयात दावा दाखल करता येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील लघु प्रकल्पांमधून उपलब्ध होणाºया पाण्यात तेलबिया व चारा पिकास प्राधान्य देण्यात येणार असून ही मंजुरी पाण्याची उपलब्धता विचारात घेऊनच देण्यात येणार आहे.अवैध उपसा करणा-यांवर कारवाईचा इशाराकालवा, जलाशय व नदी यावरील मंजूर उपसाधारकांव्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रिक मोटारी अथवा आॅइल इंजिन ठेवून अथवा पाइपलाइनद्वारे व डोंगळा पाइपद्वारे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याचे स्थानिक अधिकारी यांचे निदर्शनास येताच सिंचन अधिनियम संबंधिताची इलेक्ट्रिक मोटार, आॅइल इंजिन व तत्संबंधित साहित्यावर जप्ती करण्यासह पोलीस फिर्याद दाखल करण्याचा इशारा देतानाच कुणीही विना परवानगी पाणी वापर करू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे.उच्च न्यायालयात जायकवाडी धरणासाठी पाणी सोडणेबाबत जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन निर्णयानुसार अथवा शासन निर्णयानुसार आवर्तन देणेबाबत कार्यवाही होणार आहे. तसेच सिंचन पुरवठ्यासाठी केवळ खरिपाचे मागणी क्षेत्र मागविण्यात येत आहे. आवर्तन कालावधी अथवा कालव्यातून पाणी सोडणेबाबत शासन अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर कालवा सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती