शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

गोदाकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: August 5, 2016 02:04 IST

तत्काळ पंचनामे करण्याचा ठराव संमत : स्थायी समिती बैठक

नाशिक : जिल्ह्यात २ आॅगस्टला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठच्या गावांचा पाणी व वीजपुरवठा खंडित झाला असून, त्याबाबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण ठराव गुरुवारी (दि. ४) संमत करण्यात आले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, शोभा डोखळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य रवींद्र देवरे, प्रा. अनिल पाटील, प्रवीण जाधव, शैलेश सूर्यवंशी, कृष्णराव गुंड, गोरख बोडके आदि उपस्थित होते.रवींद्र देवरे यांनी जिल्ह्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावे. बांधकाम विभागाने झालेल्या इमारतीच्या नुकसानीचे तसेच लघुपाटबंधारे विभागाने अतिवृष्टीमुळे झालेल्या गावतळे, पाझरतलाव यांचे तत्काळ पंचनामे करावे, तसा अहवाल सादर करून जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीसाठी पूरहानीतून मदतीचा प्रस्ताव पाठवावा, असा ठराव संमत केला. शैलेश सूर्यवंशी यांनी त्यात भर घालत उशिराने आलेल्या पावसामुळे आताच पेरण्या केलेल्या काही खरीप पिकांचे या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासन आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच पुरामुळे जेथे जेथे पाणीपुरवठा योजना बंद झालेल्या आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे तो तत्काळ पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याचा ठराव मांडला.पूरहानीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश वीज पोल पडले असल्याचे, तसेच त्यामुळे वीजपुरवठा खंडित असल्याचे गोरख बोडके व प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले.याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विजयश्री चुंभळे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावेळी ठाकूर यांनी वीज साहित्य देखभाल दुरुस्तीसाठी १९३७ गावांपैकी १५०० गावांना प्रत्येकी साडेसहा लाखांचा असा एकूण १०२ कोटींचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)