शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

गोदाकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: August 5, 2016 02:04 IST

तत्काळ पंचनामे करण्याचा ठराव संमत : स्थायी समिती बैठक

नाशिक : जिल्ह्यात २ आॅगस्टला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठच्या गावांचा पाणी व वीजपुरवठा खंडित झाला असून, त्याबाबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, असे महत्त्वपूर्ण ठराव गुरुवारी (दि. ४) संमत करण्यात आले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, शोभा डोखळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य रवींद्र देवरे, प्रा. अनिल पाटील, प्रवीण जाधव, शैलेश सूर्यवंशी, कृष्णराव गुंड, गोरख बोडके आदि उपस्थित होते.रवींद्र देवरे यांनी जिल्ह्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावे. बांधकाम विभागाने झालेल्या इमारतीच्या नुकसानीचे तसेच लघुपाटबंधारे विभागाने अतिवृष्टीमुळे झालेल्या गावतळे, पाझरतलाव यांचे तत्काळ पंचनामे करावे, तसा अहवाल सादर करून जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीसाठी पूरहानीतून मदतीचा प्रस्ताव पाठवावा, असा ठराव संमत केला. शैलेश सूर्यवंशी यांनी त्यात भर घालत उशिराने आलेल्या पावसामुळे आताच पेरण्या केलेल्या काही खरीप पिकांचे या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासन आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच पुरामुळे जेथे जेथे पाणीपुरवठा योजना बंद झालेल्या आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे तो तत्काळ पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याचा ठराव मांडला.पूरहानीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश वीज पोल पडले असल्याचे, तसेच त्यामुळे वीजपुरवठा खंडित असल्याचे गोरख बोडके व प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले.याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विजयश्री चुंभळे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावेळी ठाकूर यांनी वीज साहित्य देखभाल दुरुस्तीसाठी १९३७ गावांपैकी १५०० गावांना प्रत्येकी साडेसहा लाखांचा असा एकूण १०२ कोटींचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)