शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांपासून महापालिकेला कराराविनाच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:12 IST

गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही.

नाशिक : गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लवकरच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलाविण्याचे आदेश दिले आहेत.  महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर राधाकृष्ण गमे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. त्या दरम्यान, याबाबत चर्चा झाली आहे. नाशिक महापालिकेला गंगापूर धरणातून वर्षानुवर्षे पुरवठा होतो, त्याचबरोबर दारणा धरणातूनदेखील जलसंपदा विभाग पाणी उपलब्ध करून देते. महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानात सहभागी झाल्यानंतर वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या योजना आखल्या होत्या. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठ्याची हमी आणि मंजुरी हवी असल्याने २००८ मध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक झाली होती. त्यावेळी शहरातील भविष्यकालीन योजनांसाठी नवा प्रकल्प म्हणून किकवी धरणास मान्यता देण्यात आली. सदरचे धरण आधी महापालिकेच्या वतीने बांधण्यात येणार होते, परंतु नंतर शासनाने बांधण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, अशाप्रकारचे धरण बांधण्याच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने बाधित सिंचन क्षेत्राची भरपाई म्हणून महापालिकेकडे तगादा लावला. सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती आता कमी झाली असली तरी वाढीव मागणीची देयके देताना आधी रक्कम भरा, मगच वार्षिक पाणी वितरणाचे करार करण्यात येईल, अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतल्याने गेल्या २०११ पासून महापालिकेकडे वार्षिक पाणी वितरणाचा अद्याप करारच करण्यात आलेला नाही. अर्थात, जलसंपदा विभागाने महपालिकेचे पाणी रोखले नाही की, महापालिकेने अद्याप कोणत्याही प्रकारचे देयक प्रलंबित ठेवलेले नाही.आयुक्त गमे यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेताना हा प्रकार उघड झाल्याने त्यांनी हा विषय प्रलंबित न ठेवता तो निकाली काढण्याची भूमिका घेतली असून, जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांबरोबरच बैठक बोलाविण्यास सांगितले आहे.किकवीबरोबर कश्यपीचा प्रश्नही जटिलकिकवी धरण न बांधताच महापालिकेचे बाधित सिंचन क्षेत्राचा खर्च मागण्यात आला होता. आता तर या धरणाच्या निविदाही रद्द आहेत. परंतु त्याचबरोबर १९९२ पासून कश्यपी धरणाचादेखील प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेने या धरणात आर्थिक सहभाग देण्यासाठी पाच कोटी रुपये दिल्यानंतर धरणाची किंमत वाढल्याने वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी