शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आठ वर्षांपासून महापालिकेला कराराविनाच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:12 IST

गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही.

नाशिक : गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लवकरच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलाविण्याचे आदेश दिले आहेत.  महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर राधाकृष्ण गमे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. त्या दरम्यान, याबाबत चर्चा झाली आहे. नाशिक महापालिकेला गंगापूर धरणातून वर्षानुवर्षे पुरवठा होतो, त्याचबरोबर दारणा धरणातूनदेखील जलसंपदा विभाग पाणी उपलब्ध करून देते. महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानात सहभागी झाल्यानंतर वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या योजना आखल्या होत्या. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठ्याची हमी आणि मंजुरी हवी असल्याने २००८ मध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक झाली होती. त्यावेळी शहरातील भविष्यकालीन योजनांसाठी नवा प्रकल्प म्हणून किकवी धरणास मान्यता देण्यात आली. सदरचे धरण आधी महापालिकेच्या वतीने बांधण्यात येणार होते, परंतु नंतर शासनाने बांधण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, अशाप्रकारचे धरण बांधण्याच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने बाधित सिंचन क्षेत्राची भरपाई म्हणून महापालिकेकडे तगादा लावला. सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती आता कमी झाली असली तरी वाढीव मागणीची देयके देताना आधी रक्कम भरा, मगच वार्षिक पाणी वितरणाचे करार करण्यात येईल, अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतल्याने गेल्या २०११ पासून महापालिकेकडे वार्षिक पाणी वितरणाचा अद्याप करारच करण्यात आलेला नाही. अर्थात, जलसंपदा विभागाने महपालिकेचे पाणी रोखले नाही की, महापालिकेने अद्याप कोणत्याही प्रकारचे देयक प्रलंबित ठेवलेले नाही.आयुक्त गमे यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेताना हा प्रकार उघड झाल्याने त्यांनी हा विषय प्रलंबित न ठेवता तो निकाली काढण्याची भूमिका घेतली असून, जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांबरोबरच बैठक बोलाविण्यास सांगितले आहे.किकवीबरोबर कश्यपीचा प्रश्नही जटिलकिकवी धरण न बांधताच महापालिकेचे बाधित सिंचन क्षेत्राचा खर्च मागण्यात आला होता. आता तर या धरणाच्या निविदाही रद्द आहेत. परंतु त्याचबरोबर १९९२ पासून कश्यपी धरणाचादेखील प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेने या धरणात आर्थिक सहभाग देण्यासाठी पाच कोटी रुपये दिल्यानंतर धरणाची किंमत वाढल्याने वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी