शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

३६ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:42 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत प्रकरणी महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, भविष्यात आणखी काही ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची जोडणी तसेच पथदीपांचा वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मंगेशकुमार प्रजापती यांनी दिला आहे.

ठळक मुद्देइगतपुरी तालुका : विद्युत जोडणी कापली; साडेसात कोटी थकबाकी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत प्रकरणी महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, भविष्यात आणखी काही ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची जोडणी तसेच पथदीपांचा वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मंगेशकुमार प्रजापती यांनी दिला आहे.इगतपुरी तालुक्यात महावितरण कंपनीने १२८ ठिकाणी पाणीपुरवठा वीजजोडणी दिलेली आहे. त्यापैकी ३६ ग्रामपंचायतींकडे सात कोटी ५० लाखांच्यावर थकबाकी आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून महावितरण कंपनीची बिले मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींनी थकीत बिले भरले नसल्याने वीजजोडणी खंडित होण्याची नामुष्की ओढवली आहे.इगतपुरी तालुक्यात ९६ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा व पथदीपांकरिता वेगवेगळी जोडणी वीज वितरण कंपनीने दिली आहे. येत्या काळात थकीत बिले न भरल्यास गाव अंधारात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावे अंधारात राहू नये म्हणून ग्रामपंचायतकडे महावितरण कंपनी बिले भरण्यासाठी मागणी करत असून, ग्रामपंचायतीत नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे...या ग्रामपंचायतींवर केली कारवाईपाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये वाकी, कुर्णोली, बिटुर्ली, टाकेद, धामणी, खेड, उंबरकोण, खडकेद, कावनई, साकूर, धारगाव, सातुर्ली, जानोरी, नांदगाव बु., बारशिंगवे, उंबरकोण, सोनोशी, शेवरेवाडी, अधरवड, उभाडे, अडसरे, धामणगाव, भावली, आहुर्ली, आवळी, वासाळी, इंदोरे, देवळे, मुरंबी, अस्वली, आवळखेड, घोटी खुर्द, निनावी यांचा समावेश आहे.तालुक्यातील ग्रामपंचायतींनी गत २ ते ३ वर्षांपासून थकबाकी भरली नसल्याने ३६ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठ्यासाठीचा असलेला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, त्वरित थकीत रक्कम न भरल्यास पथदीपांचा वीजपुरवठासुद्धा नाइलाजास्तव खंडित करावा लागेल. संबंधितांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे व थकीत रक्कम त्वरित भरावी.- मंगेशकुमार प्रजापती, उपकार्यकारी अभियंता, इगतपुरी. 

 

टॅग्स :talukaतालुकाwater shortageपाणीकपात