शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

जिल्ह्यात धरणांत ७९ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:25 IST

नाशिक : गेल्या दहा - बारा दिवसांपासून संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा तालुकावगळता अन्य तालुक्यांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत असून, १४ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांवर साठा आहे तर तब्बल १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

ठळक मुद्दे१९ प्रकल्पांतून विसर्ग : १४ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांवर साठा; नांदगाव तालुक्याची स्थिती गंभीर, अनेक ठिकाणी पिकांना धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दहा - बारा दिवसांपासून संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा तालुकावगळता अन्य तालुक्यांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत असून, १४ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांवर साठा आहे तर तब्बल १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ३९ टक्के पावसाची नोंद नांदगाव तालुक्यात झाली असून, माणिकपुंज, नागासाक्या प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत.जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे काही तालुक्यांमध्ये आता वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घातले जात आहे. जिल्ह्यातील नाशिक (१६० टक्के), इगतपुरी (११६ टक्के), दिंडोरी (१२७ टक्के), पेठ (१११ टक्के), त्र्यंबकेश्वर (१४३ टक्के), बागलाण (१०० टक्के), सुरगाणा (११८ टक्के) आणि सिन्नर (१११ टक्के) या तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०९ टक्के पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाऊस झालेला होता. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.जिल्ह्यातील १४ प्रकल्पांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झालेला आहे. त्यामुळे त्या त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न जवळपास मिटला आहे. जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यात गंगापूर (५१०४ क्यूसेक), काश्यपी (१०५५), गौतमी गोदावरी (५७०), आळंदी (९६१), पालखेड (११७८८), करंजवण (४०३०), वाघाड (१९९५), पुणेगाव (२६८), दारणा (५३६०), भावली (२९०), मुकणे (५००), वालदेवी (१३०५), कडवा (७७६), नांदूरमधमेश्वर (३६,१४२), भोजापूर (९९०), चणकापूर (५५८६), हरणबारी (२५८४), केळझर (८३९), पुनंद (१३४२) याप्रमाणे विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यात प्रामुख्याने, पालखेडमध्ये मागील वर्षी २७ टक्के साठा होता. यंदा तो ७० टक्क्यांवर गेलाआहे. ओझरखेड येथील साठाही मागील वर्षी ५० टक्के होता तो ८३ टक्के झाला आहे. तिसगाव येथील साठा मागील वर्षी १९ टक्के होता यंदा त्यात लक्षणीय वाढ होत तो ६३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने समाधान व्यक्त केले जात असून, प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नागासाक्या, माणिकपुंज शून्यचजिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पावसाने टक्केवारीची शंभरी गाठलेली असताना नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा तालुक्यांतील पर्जन्यमानाची स्थिती कठीण बनलेली आहे. नांदगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नागासाक्या व माणिकपुंज या प्रकल्पात एक थेंबही पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे नांदगावची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यापाठोपाठ देवळा तालुक्यात ४५ टक्के, कळवण तालुक्यात ५६ टक्के, तर चांदवड तालुक्यात ६१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. येवला तालुक्यातील काही भागात वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली असली तरी राजापूर, नस्तनपूर परिसरातील धरती अद्यापही तहानलेलीच आहे.पावसाने सरासरी ओलांडलीजिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १०१३ मिमी. इतकी आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सरसरी ११०९ मिमी. इतका पाऊस कोसळला असून, दोन दिवसांपूर्वीच पावसाने सरासरी ओलांडली आहे. गोदावरीत गेल्या चार दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू असून, पूरस्थितीमुळे गोदाकाठ परिसरातील जनजीवन कोलमडून पडले आहे. अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने जमिनीचा कस बिघडण्याबरोबरच पिकांनाही धोका उत्पन्न झाला आहे.