शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

धरणांतील जलसाठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:11 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील धरणांना मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याची चणचण भासण्यास सुरुवात झाल्याने पुढे भर उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी वर्गाला पाणी टंचाईची भीती वाटू लागली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुका : शेतकऱ्यांना पाणीटंचाईची भीती

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील धरणांना मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याची चणचण भासण्यास सुरुवात झाल्याने पुढे भर उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी वर्गाला पाणी टंचाईची भीती वाटू लागली आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने धरणांचे माहेरघर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील धरणांतील पाणी साठा दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. जलसाठा निम्म्याच्या आत आला आहे. त्यात यंदाच्या उन्हाळ्याचे स्वरूप अतिशय कडक असण्याचे भाकीत जाणकारांकडून व्यक्त केले जात असल्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भीती आताच तालुक्यातील नागरिक व शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.

मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पावसाळ्यात एकाही नदीला महापूर आलेला नाही. २०१९ मध्ये दिंडोरी तालुक्यातील धरणे १०० टक्के भरली होती. परंतु मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणे पूर्ण भरलीच नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत थोड्या फार प्रमाणावर वाढ झाली. परंतु तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील नद्या मात्र ओसंडून वाहिल्यांच नाहीत.रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन हे राखीव असल्याने ते द्यावेच लागते. त्यासाठी पालखेड, करंजवण, ओझरखेड धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांसाठी राखीव असतो. आताच पाण्याचा साठा कमी होऊ लागल्याने पुढे उन्हाळ्यात आणखी पाणीटंचाई जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे.दिंडोरी तालुक्यातील धरणातील पाणीसाठाकरंजवण - ६०.६५ टक्केपालखेड - २९.४३ टक्केवाघाड - २८.०४ टक्केपुणेगाव - ५५.७१ टक्केओझरखेड - ६३.०६ टक्केतिसगाव - ५५.१४ टक्के 

टॅग्स :WaterपाणीDamधरण