शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

धरणांतील जलसाठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:11 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील धरणांना मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याची चणचण भासण्यास सुरुवात झाल्याने पुढे भर उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी वर्गाला पाणी टंचाईची भीती वाटू लागली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुका : शेतकऱ्यांना पाणीटंचाईची भीती

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील धरणांना मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याची चणचण भासण्यास सुरुवात झाल्याने पुढे भर उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी वर्गाला पाणी टंचाईची भीती वाटू लागली आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने धरणांचे माहेरघर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील धरणांतील पाणी साठा दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. जलसाठा निम्म्याच्या आत आला आहे. त्यात यंदाच्या उन्हाळ्याचे स्वरूप अतिशय कडक असण्याचे भाकीत जाणकारांकडून व्यक्त केले जात असल्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भीती आताच तालुक्यातील नागरिक व शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.

मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पावसाळ्यात एकाही नदीला महापूर आलेला नाही. २०१९ मध्ये दिंडोरी तालुक्यातील धरणे १०० टक्के भरली होती. परंतु मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणे पूर्ण भरलीच नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत थोड्या फार प्रमाणावर वाढ झाली. परंतु तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील नद्या मात्र ओसंडून वाहिल्यांच नाहीत.रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन हे राखीव असल्याने ते द्यावेच लागते. त्यासाठी पालखेड, करंजवण, ओझरखेड धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांसाठी राखीव असतो. आताच पाण्याचा साठा कमी होऊ लागल्याने पुढे उन्हाळ्यात आणखी पाणीटंचाई जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे.दिंडोरी तालुक्यातील धरणातील पाणीसाठाकरंजवण - ६०.६५ टक्केपालखेड - २९.४३ टक्केवाघाड - २८.०४ टक्केपुणेगाव - ५५.७१ टक्केओझरखेड - ६३.०६ टक्केतिसगाव - ५५.१४ टक्के 

टॅग्स :WaterपाणीDamधरण