शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई : आणखी काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:50 IST

येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात ३६ गावे, २६ वाड्यांना टँकरद्वारे पाणी

येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.यंदा अत्यल्प पावसाने शेतशिवार अल्प प्रमाणात भिजले; परंतु शेतकऱ्यांची तहान भागलीच नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसातही उष्मा अद्यापही कायम आहे. यंदा तालुक्यात पाण्यासाठीची भटकंती थांबलीच नाही. तालुक्यात टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची साडेसाती काही केल्या संपेना.येवला परिसरात ५९२ मिमी पावसाची नोंद सरकार दरबारी दिसत असल्याने, येवला मंडळातील १८ गावे दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित राहिली तर पाटोदा, राजापूर, सावरगाव, अंदरसूल, नगरसूल या पाच मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे.तालुक्यात जलयुक्त शिवाराचा कागदी डांगोरा, पाण्याचे शून्य नियोजन, असेल तेव्हा वारेमाप पाणीउपसा, पाणी अडवा पाणी जिरवा या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेले अपयश यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ अनेक ग्रामस्थांवर आली आहे.भूजल पातळी खालावलीपाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षलागवड केवळ कागदावरच राहिले आहे. याचे भान आता अधिकारी व ग्रामस्थांनाच यायला हवे. अन्यथा अनेक गावांना पाण्याअभावी स्थलांतर करण्याची वेळ दूर नाही. येवला तालुक्यात दहा मीटरच्या खाली भूजल पातळी गेली आहे. अनकाईसारख्या भागात १८ मीटरपर्यंत कोरडी विहीर जाते. यावरून पाण्याच्या पातळीचा अंदाज येतो. दरवर्षी जानेवारी संपला की पुन्हा पाणीटंचाईचे वेध सुरू होतात, ही शोकांतिका आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. नियोजनशून्य पाण्याचा वापर हे एक प्रमुख कारण आहे. पंचायत समितीकडे टॅकरची मागणीरहाडी, धामणगाव, कासारखेडे, शिवाजीनगर, बाळापूर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाणजोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, वाघाळे, खरवंडी, आडसुरेगाव, कोळमबुद्रुक, कोळम खुर्द, डोंगरगाव, कौटखेडे, नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, देवदरी, नीळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर. नगरसूल परिसरातील १२ वाड्या, राजापूर परिसरातील तीन वाड्या, भगतवस्ती (अनकाई ), बोराडे वस्ती (गोरखनगर), हनुमाननगर व (खिर्डीसाठे), अहिरेवस्ती (पिंपळखुटे खुर्द), सायगाव येथील महादेववाडी, कुळधरवस्ती (सायगाव), ममदापूर परिसरातील दोन वस्त्या, देवदरी (दाणेवस्ती), खरवंडी (बावाचे वस्ती), तळवडे परिसर चार वस्त्या, तालुक्यातील अन्य ठिकाणावरूनही पाणी टँकरची मागणी येवला पंचायत समितीकडे येत असून, आणखी गावे वाढण्याची शक्यता आहे.