शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पाणीटंचाई : आणखी काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:50 IST

येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात ३६ गावे, २६ वाड्यांना टँकरद्वारे पाणी

येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.यंदा अत्यल्प पावसाने शेतशिवार अल्प प्रमाणात भिजले; परंतु शेतकऱ्यांची तहान भागलीच नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसातही उष्मा अद्यापही कायम आहे. यंदा तालुक्यात पाण्यासाठीची भटकंती थांबलीच नाही. तालुक्यात टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची साडेसाती काही केल्या संपेना.येवला परिसरात ५९२ मिमी पावसाची नोंद सरकार दरबारी दिसत असल्याने, येवला मंडळातील १८ गावे दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित राहिली तर पाटोदा, राजापूर, सावरगाव, अंदरसूल, नगरसूल या पाच मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे.तालुक्यात जलयुक्त शिवाराचा कागदी डांगोरा, पाण्याचे शून्य नियोजन, असेल तेव्हा वारेमाप पाणीउपसा, पाणी अडवा पाणी जिरवा या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेले अपयश यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ अनेक ग्रामस्थांवर आली आहे.भूजल पातळी खालावलीपाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षलागवड केवळ कागदावरच राहिले आहे. याचे भान आता अधिकारी व ग्रामस्थांनाच यायला हवे. अन्यथा अनेक गावांना पाण्याअभावी स्थलांतर करण्याची वेळ दूर नाही. येवला तालुक्यात दहा मीटरच्या खाली भूजल पातळी गेली आहे. अनकाईसारख्या भागात १८ मीटरपर्यंत कोरडी विहीर जाते. यावरून पाण्याच्या पातळीचा अंदाज येतो. दरवर्षी जानेवारी संपला की पुन्हा पाणीटंचाईचे वेध सुरू होतात, ही शोकांतिका आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. नियोजनशून्य पाण्याचा वापर हे एक प्रमुख कारण आहे. पंचायत समितीकडे टॅकरची मागणीरहाडी, धामणगाव, कासारखेडे, शिवाजीनगर, बाळापूर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाणजोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, वाघाळे, खरवंडी, आडसुरेगाव, कोळमबुद्रुक, कोळम खुर्द, डोंगरगाव, कौटखेडे, नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, देवदरी, नीळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर. नगरसूल परिसरातील १२ वाड्या, राजापूर परिसरातील तीन वाड्या, भगतवस्ती (अनकाई ), बोराडे वस्ती (गोरखनगर), हनुमाननगर व (खिर्डीसाठे), अहिरेवस्ती (पिंपळखुटे खुर्द), सायगाव येथील महादेववाडी, कुळधरवस्ती (सायगाव), ममदापूर परिसरातील दोन वस्त्या, देवदरी (दाणेवस्ती), खरवंडी (बावाचे वस्ती), तळवडे परिसर चार वस्त्या, तालुक्यातील अन्य ठिकाणावरूनही पाणी टँकरची मागणी येवला पंचायत समितीकडे येत असून, आणखी गावे वाढण्याची शक्यता आहे.