शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

पाणीटंचाई : आणखी काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:50 IST

येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात ३६ गावे, २६ वाड्यांना टँकरद्वारे पाणी

येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.यंदा अत्यल्प पावसाने शेतशिवार अल्प प्रमाणात भिजले; परंतु शेतकऱ्यांची तहान भागलीच नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसातही उष्मा अद्यापही कायम आहे. यंदा तालुक्यात पाण्यासाठीची भटकंती थांबलीच नाही. तालुक्यात टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची साडेसाती काही केल्या संपेना.येवला परिसरात ५९२ मिमी पावसाची नोंद सरकार दरबारी दिसत असल्याने, येवला मंडळातील १८ गावे दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित राहिली तर पाटोदा, राजापूर, सावरगाव, अंदरसूल, नगरसूल या पाच मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे.तालुक्यात जलयुक्त शिवाराचा कागदी डांगोरा, पाण्याचे शून्य नियोजन, असेल तेव्हा वारेमाप पाणीउपसा, पाणी अडवा पाणी जिरवा या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेले अपयश यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ अनेक ग्रामस्थांवर आली आहे.भूजल पातळी खालावलीपाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षलागवड केवळ कागदावरच राहिले आहे. याचे भान आता अधिकारी व ग्रामस्थांनाच यायला हवे. अन्यथा अनेक गावांना पाण्याअभावी स्थलांतर करण्याची वेळ दूर नाही. येवला तालुक्यात दहा मीटरच्या खाली भूजल पातळी गेली आहे. अनकाईसारख्या भागात १८ मीटरपर्यंत कोरडी विहीर जाते. यावरून पाण्याच्या पातळीचा अंदाज येतो. दरवर्षी जानेवारी संपला की पुन्हा पाणीटंचाईचे वेध सुरू होतात, ही शोकांतिका आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. नियोजनशून्य पाण्याचा वापर हे एक प्रमुख कारण आहे. पंचायत समितीकडे टॅकरची मागणीरहाडी, धामणगाव, कासारखेडे, शिवाजीनगर, बाळापूर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाणजोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, वाघाळे, खरवंडी, आडसुरेगाव, कोळमबुद्रुक, कोळम खुर्द, डोंगरगाव, कौटखेडे, नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, देवदरी, नीळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर. नगरसूल परिसरातील १२ वाड्या, राजापूर परिसरातील तीन वाड्या, भगतवस्ती (अनकाई ), बोराडे वस्ती (गोरखनगर), हनुमाननगर व (खिर्डीसाठे), अहिरेवस्ती (पिंपळखुटे खुर्द), सायगाव येथील महादेववाडी, कुळधरवस्ती (सायगाव), ममदापूर परिसरातील दोन वस्त्या, देवदरी (दाणेवस्ती), खरवंडी (बावाचे वस्ती), तळवडे परिसर चार वस्त्या, तालुक्यातील अन्य ठिकाणावरूनही पाणी टँकरची मागणी येवला पंचायत समितीकडे येत असून, आणखी गावे वाढण्याची शक्यता आहे.