शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

धरणातील साठा वाढल्याने पाणीकपात अखेरीस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:35 IST

गंगापूर धरणात ८० टक्के साठा होताच महापालिकेने तातडीने पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली असून, मंगळवारपासून (दि.३०) त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक : गंगापूर धरणात ८० टक्के साठा होताच महापालिकेने तातडीने पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली असून, मंगळवारपासून (दि.३०) त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.गंगापूर धरणातील पातळी खालावल्याने आणि पावसानेदेखील ओढ दिल्याने शहरावर जलसंकट कोसळले होते. त्यामुळे गेल्या ३० जूनपासून शहरातील ज्या भागात पाणी दोन वेळा पाणीपुरवठा होतो अशा भागात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला, तर दर गुरुवारी संपूर्ण शहरातच पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.शहराला पाच धरणांमधून पाणीपुरवठा होत असला तरी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या घोळामुळे गौतमी गोदावरी आणि कश्यपी धरणात दीडशे लक्षघनफूट पाणी असूनही त्याचा उपसा करणे शक्य झाले नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार महापालिकेने केला आणि धरणातील पाणी कमी झाल्यावर चर काढण्याचे काम सुरू केले, परंतु नंतर पाऊस सुरू झाल्याने हे काम करता आले नाही. त्यामुळे दारणात दीडशे, तर गंगापूर धरण समूहात दीडशे असे तीनशे दशलक्षघनफूट पाणी असूनही नाशिककरांवर पाणीकपातीला सामोरे जाण्याची नामुष्की आली होती. महापालिकेच्या पाणीकपातीमुळे गावठाण भागात ज्या ठिकाणी उंच सखल भाग आहे. तेथे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पंचवटी व नदीकाठच्या भागात प्रथमच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. उपनगर, पाथर्डी फाटा याठिकाणीही पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.अवघी पाच टक्केचहोती कपातमहापालिकेच्या वतीने पाणीकपात रद्द करण्यात आली आणि त्याचा गाजावाजा खूप झाला असला तरी प्रत्यक्षात संपूर्ण शहरात पाच टक्केच पाणीकपात झाली होती आणि गावठाण भागाला त्याचा सर्वाधिक फटका बसला होता. शहरातील ज्या भागात एकवेळ पाणीपुरवठा होतो तेथे मनपाने कोणत्याही प्रकारची कपात केली नव्हती.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका