शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 17:04 IST

उपाययोजना : जैन फाऊण्डेशनचा पुढाकार

ठळक मुद्देमेटघेरा या ग्रामपंचायतीच्या महादरवाजा, गंगाद्वार, सुपलीची मेट, पठारवाडी, जांभुळवाडी, जांबाची मेट आदी ठिकाणी पाणीच पोहचत नसल्याने चिंता व्यक्त

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाड्या-पाड्यांमधील विहिरींनी तळ गाठला असून डोंगराच्या कुशीतील झरे-नाले आटल्याने पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. पाणीटंचाईमुळे प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे. त्यामुळे अधिकारीवर्ग रात्रीही दौरे करत आहेत. पावसाळा सुरू व्हायला अद्याप दीड महिना बाकी असताना पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२) प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसिलदार दिपक गिरासे व जैन फाऊण्डेशनचे नंदलाल साखला यांची यंबक पंचायत समिती कार्यालयात बैठक झाली. मेटघेरा या ग्रामपंचायतीच्या महादरवाजा, गंगाद्वार, सुपलीची मेट, पठारवाडी, जांभुळवाडी, जांबाची मेट आदी ठिकाणी पाणीच पोहचत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. या ठिकाणी जैन फाउंडेशन व लोक श्रमदानातुन येत्या ४ ते ५ दिवसात पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. नगरपालिकेच्या बांधलेल्या टाकीत पाणी साठा होत असतो. तेथुन सिंगल फेजने पाणी वरती नेउन सर्वांना पाणी पुरवठा करण्यात येईल. यातील पाईपलाईनचे काम श्रमदानातुन करण्यात येईल. तर पाईपलाईन मोटार वगैरे खर्च भारतीय जैन संघटनेचे नंदलाल साखला, गोटु चोरडीया यांच्या पुढाकाराने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.बरड्याच्या वाडीला पोहोचले पाणीदरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील टंचाई संदर्भात दोन प्रकारे उपाययोजना तहसिलदार दिपक गिरासे यांनी केल्या आहेत. त्यानुसार गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टँकर द्वारे पाणी टाकण्यात आलेतर टँकर गावातील टाक्यांपर्यंत पोहोचत नसल्याने टँकर मधील पाणी डिझेल इंजिन द्वारे टाक्यांमध्ये भरण्यात आले. याशिवाय, कायमस्वरु पी उपाययोजनांमध्ये वैतरणा धरणातून वावीहर्ष ते दुगारवाडीपर्यंत पुर्वी पाईप लाईन गेलेली आहे. त्या पाईपलाईनला वावीहर्ष ते बरड्याची वाडी यादरम्यान असणारी जुनी पाईप लाईन दुरु स्त व जोडणी केल्याने गावातील टाक्यांपर्यंत पाणी नेल्याने ग्रामस्थांना गावातच मुबलक पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बर्ड्याच्या वाडीची पाणी समस्या मिटली असल्याचे तहसिलदारांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई