शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भरपावसातही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:38 IST

प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंदिरानगर : प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.गजानन महाराज रस्त्यालगत असलेल्या विविध सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्ये अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून आत्मविश्वास सोसायटी, पाटील गार्डन, आयटीआय कॉलनी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी,  अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर-एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, कमोदनगर यांसह परिसरात अत्यंत कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही, तर वापरायला पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न परिसरातील महिला वर्गांना भेडसावत आहे.अभियंत्यांना घेरावगेल्या वर्षापासून प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे परिसरातील महिलावर्गही त्रस्त झाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलने आणि घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रभागाचे नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे आणि प्रभागाच्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतांना घेराव घातला होता. तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी