शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

लोकसहभागातून राबवणार जलशक्ती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:32 IST

महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जुलै ते १५ सप्टेंबर या काळात पाच घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात पावसाळी पाण्याचे संवर्धन, प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, नैसर्गिक जलाशय सरोवरांचे पुनरुत्थान, वृक्षारोपण व जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळी पाण्याचे संवर्धनच्या माध्यमातून घराच्या छतावर व रस्त्यावर खुल्या जागेमध्ये पडणारे पावसाचे पाणी साठविणे व संवर्धन करून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.हा उपक्रम मनपाची कार्यालये तसेच सार्वजनिक इमारती, निवासी इमारती, गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. नगररचना विभागाकडून यापुढे बांधकाम परवानगी देताना रेनवॉटर हार्व्हेस्टिंग केले आहे किंवा नाही याची कटाक्षाने पाहणी केली जाईल. नैसर्गिक जलाशयाचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने शहरांमध्ये असणारे नैसर्गिक पाण्याचे जलाशय, तलाव, सरोवर, विहिरी बावडी जलस्रोतांचे पुनरुत्थान करण्यात येत आहे.या नैसर्गिक जलस्रोतांची साफसफाईदेखील केली जाणार आहे. वृक्षारोपणासाठी जागांची निवड करण्यात येऊन त्या जागेवर तसेच शाळांच्या आवारात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पाणी बचतीसाठी शहरात जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी यात सक्रिय सहभागी होऊन मनपास सहकार्य करावे, तसेच जलसंधारणाचे अधिकाधिक उपक्रम राबवावे असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी