शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

लोकसहभागातून राबवणार जलशक्ती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:32 IST

महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जुलै ते १५ सप्टेंबर या काळात पाच घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात पावसाळी पाण्याचे संवर्धन, प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, नैसर्गिक जलाशय सरोवरांचे पुनरुत्थान, वृक्षारोपण व जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळी पाण्याचे संवर्धनच्या माध्यमातून घराच्या छतावर व रस्त्यावर खुल्या जागेमध्ये पडणारे पावसाचे पाणी साठविणे व संवर्धन करून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.हा उपक्रम मनपाची कार्यालये तसेच सार्वजनिक इमारती, निवासी इमारती, गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. नगररचना विभागाकडून यापुढे बांधकाम परवानगी देताना रेनवॉटर हार्व्हेस्टिंग केले आहे किंवा नाही याची कटाक्षाने पाहणी केली जाईल. नैसर्गिक जलाशयाचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने शहरांमध्ये असणारे नैसर्गिक पाण्याचे जलाशय, तलाव, सरोवर, विहिरी बावडी जलस्रोतांचे पुनरुत्थान करण्यात येत आहे.या नैसर्गिक जलस्रोतांची साफसफाईदेखील केली जाणार आहे. वृक्षारोपणासाठी जागांची निवड करण्यात येऊन त्या जागेवर तसेच शाळांच्या आवारात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पाणी बचतीसाठी शहरात जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी यात सक्रिय सहभागी होऊन मनपास सहकार्य करावे, तसेच जलसंधारणाचे अधिकाधिक उपक्रम राबवावे असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी