शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

त्र्यंबक तालुक्यात पाणीटंचाईची धग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:02 IST

त्र्यंबकेश्वर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागताच तालुक्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले असून, त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. मूळवड ग्रामपंचायत अंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देविहिरींनी गाठला तळ : पाण्यासाठी महिलांची भटकंती

त्र्यंबकेश्वर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागताच तालुक्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले असून, त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. मूळवड ग्रामपंचायत अंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मागील वर्षी त्र्यंबकेश्वरला १४२३.८ मि. मी. पाऊस पडला होता. पावसाचे शेकडा प्रमाण ७५.३६ टक्के होते; मात्र यावर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाईची धग जाणवायला सुरुवात झाली आहे. या पाणीटंचाईसंदर्भात मुळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ, सरपंच चंचला बळीराम बांगाड यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापतींकडे कैफीयत मांडली; पण प्रशासनाकडून अद्याप काहीही उपाय योजना झालेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास हंडामोर्चा काढण्याचा इशारा घाटाळ यांनी दिला आहे. टंचाईग्रस्त गावांबरोबरच तालुक्यातील वळण, बर्ड्याची वाडी, विनायक नगर, सोमनाथ नगर, शिवाजीनगर आदी भागातीलही विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या १० कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. दहापैकी केवळ चारच प्रस्तावांना मंजुरी मिळाली. अन्य सहा कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहेत. बर्ड्याच्या वाडीच्या पाणी प्रश्नाची तर सर्वत्र चर्चा झाली; परंतु तेथीलही पाणी टंचाईचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकलेला नाही.पडताळणीत वेळकाढूपणापाणीटंचाईच्या काळात टँकरची मागणी होऊनही प्रशासनाकडून त्याबाबत दुर्लक्ष केले जाते. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सेवाभावी संस्थांच्यावतीने पाणीटंचाईबाबत उपाययोजना केल्या जात असतात. त्यामुळे प्रशासनाकडूनही या सेवाभावी संस्थांची प्रतीक्षा केली जात असते. प्रशासनाकडे स्थानिक स्तरावरून टंचाई प्रस्ताव पाठविले जात असले तरी त्याच्या पडताळणी प्रक्रियेतच वेळकाढूपणा केला जात असतो. त्यामुळे लालफीतीच्या कारभाराचा अनुभव येत असतो.(०१ विहिरी)

टॅग्स :Waterपाणीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर