शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

त्र्यंबक तालुक्यात पाणीटंचाईची धग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:02 IST

त्र्यंबकेश्वर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागताच तालुक्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले असून, त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. मूळवड ग्रामपंचायत अंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देविहिरींनी गाठला तळ : पाण्यासाठी महिलांची भटकंती

त्र्यंबकेश्वर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागताच तालुक्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले असून, त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. मूळवड ग्रामपंचायत अंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मागील वर्षी त्र्यंबकेश्वरला १४२३.८ मि. मी. पाऊस पडला होता. पावसाचे शेकडा प्रमाण ७५.३६ टक्के होते; मात्र यावर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाईची धग जाणवायला सुरुवात झाली आहे. या पाणीटंचाईसंदर्भात मुळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ, सरपंच चंचला बळीराम बांगाड यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापतींकडे कैफीयत मांडली; पण प्रशासनाकडून अद्याप काहीही उपाय योजना झालेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास हंडामोर्चा काढण्याचा इशारा घाटाळ यांनी दिला आहे. टंचाईग्रस्त गावांबरोबरच तालुक्यातील वळण, बर्ड्याची वाडी, विनायक नगर, सोमनाथ नगर, शिवाजीनगर आदी भागातीलही विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या १० कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. दहापैकी केवळ चारच प्रस्तावांना मंजुरी मिळाली. अन्य सहा कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहेत. बर्ड्याच्या वाडीच्या पाणी प्रश्नाची तर सर्वत्र चर्चा झाली; परंतु तेथीलही पाणी टंचाईचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकलेला नाही.पडताळणीत वेळकाढूपणापाणीटंचाईच्या काळात टँकरची मागणी होऊनही प्रशासनाकडून त्याबाबत दुर्लक्ष केले जाते. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सेवाभावी संस्थांच्यावतीने पाणीटंचाईबाबत उपाययोजना केल्या जात असतात. त्यामुळे प्रशासनाकडूनही या सेवाभावी संस्थांची प्रतीक्षा केली जात असते. प्रशासनाकडे स्थानिक स्तरावरून टंचाई प्रस्ताव पाठविले जात असले तरी त्याच्या पडताळणी प्रक्रियेतच वेळकाढूपणा केला जात असतो. त्यामुळे लालफीतीच्या कारभाराचा अनुभव येत असतो.(०१ विहिरी)

टॅग्स :Waterपाणीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर