शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या पाणीटंचाई आराखड्यात ६२ गावांसह ३४ वाड्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : एकेकाळी पावसाचे माहेरघर समजले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम गुजरात राज्याच्या सीमेवरील पेठ तालुक्यात प्रतिकूल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : एकेकाळी पावसाचे माहेरघर समजले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम गुजरात राज्याच्या सीमेवरील पेठ तालुक्यात प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व सिंचन प्रकल्पांचा अभाव असल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षीही प्रशासनाने पाणीटंचाईचे ग्रहण दूर करण्यासाठी सादर केलेल्या टंचाई आराखड्यात ६२ गावे व ३४ वाड्यांचा समावेश केला आहे.

साधारण १ लाख ३७ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेठ तालुक्यात २००च्या वर गावे व वस्त्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पेसा निधी व काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बहुतांश गावांना पाणीपुरवठा केला जात असून, विजेचे भारनियमन, विजेचा कमी दाब, वनविभागाचे अडथळे यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

तालुका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ऑक्टोबर २०२० ते जून २०२१ अखेर तीन टप्प्यांत पाणीटंचाई आराखडा वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. यामध्ये प्रगतीत नळयोजना, विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, खासगी विहिरी अधिगृहित करणे, टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, बुडक्या विहिरी आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, टंचाईग्रस्त गावांच्या मागणीप्रमाणे पुढील काळात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संदीप भोसले यांनी सांगितले.

सामाजिक संस्थांचे योगदान

पेठ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना लोकवर्गणीच्या माध्यमातून टँकरमुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थांनी योगदान दिले असून, सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून गढईपाडा, वाजवड, शेवखंडी, खोटरेपाडा, फणसपाडा, पांगूळघर, खोकरतळे, एकदरे या गावांना पाणीपुरवठा योजना राबवली असून, आपली आपुलकी बहुद्देशिय संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलत कुशारे यांनी बोंडारमाळ गाव टंचाईमुक्त केल्यानंतर सध्या घुबडसाका गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याचे काम हाती घेतले आहे.

सिंचन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

पेठ तालुक्यात सद्यस्थितीत आठ लहान मोठी धरणे असली तरी त्यांची क्षमता कमी असल्याने शिवाय एकाही धरणापासून पिण्यासाठी पाणी उपसा होत नसल्याने त्यांचा टंचाई निवारणासाठी फारसा उपयोग होत नाही. तालुक्यातील जवळपास ७ नवीन मध्यम व लघू सिंचन प्रकल्प शासनस्तरावर मंजुरीचा प्रतीक्षेत आहेत. सध्याच्या प्रकल्पासून उपसा जलसिंचन योजना राबवून एका धरणातून अनेक गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची गरज भासू लागली आहे.

इन्फो...

असा आहे टंचाई आराखडा...

एकूण गावे

६२

एकूण वाड्या

३४

प्रगतीत नळ योजना

विंधन विहीर घेणे

२८

नळ योजना दुरुस्ती

विहीर खोलीकरण

१५

खासगी विहीर अधिगृहण

३१

संभाव्य टँकर संख्या

फोटो - २० पेठ १

इनामबारी धरण

===Photopath===

200421\20nsk_6_20042021_13.jpg

===Caption===

इनामबारी धरण