शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कपातीमुळे अवघी ५ टक्केच पाणी बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:08 IST

महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही, असा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे.

ठळक मुद्देबग्गा यांचा दावा : गावठाणाला वेठीस धरले

नाशिक : महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही, असा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे.गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही, त्यातच पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शहरावर पाणी संकट गहिरे होत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे महापालिकेने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या चार विभागांत दोनवेळा पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ पाणीपुरवठा होईल. त्याचप्रमाणे दर गुरुवारी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयाला पंधरा दिवस उलटत नाही तोच दर गुरुवारी कोरडा दिवस म्हणजेच ड्राय डे मागे घेऊन नियमितपणे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषत: गंगापूर धरणातील साठा ५४ टक्क्यांवर गेल्याने गेल्या सोमवारी (दि.१५) दर गुरुवारची पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. परंतु,ज्या भागांमध्ये दोनवेळ पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. तथापि, महापालिकेने पंधरा दिवसांत ७५ दशलक्षघनफूट पाणी वाचल्याचा दावा केला असला तरी बग्गा यांनी तो फोल ठरविला आहे. ३० जून ते १३ जुलै दरम्यान प्रशासनाने ५२५४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला आहे. महापलिकेने दररोजचा उपसा कायम ठेवला असता तर रोज ४६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा या हिशेबाने १४ दिवसात शहराला ६४४० दशलक्ष दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा करावा लागला असता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी