शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाणी आरक्षणात महापालिकेवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:00 IST

पावसाने दिलेल्या ओढीमुळे जिल्ह्यातील पूर्व भागावर घोंगावू लागलेले दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट पाहता नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा,

नाशिक : पावसाने दिलेल्या ओढीमुळे जिल्ह्यातील पूर्व भागावर घोंगावू लागलेले दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट पाहता नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्ला देतानाच जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी नाशिक महापालिकेची एकूण लोकसंख्या व त्यासाठी धरणातून आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाची संबंधितांकडून आकडेवारी घेताना कोणताही मेळ बसत नसल्याचे पाहून महापालिकेची गरज पाहता आॅक्टोबरच्या पाणी आरक्षणात मोठी कपात करण्याचे संकेत दिले आहेत.  जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बोलविण्यात आलेल्या बैठकीत महापालिकेच्या पाणी वापराचा विषय निघाल्याने त्याचा संदर्भ कश्यपी धरणग्रस्तांच्या प्रश्नाशी जोडला जात असून, गेल्या आठवड्यातच महापालिकेने कश्यपी धरणग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यास नकार दिल्याने त्याचवेळी जिल्हाधिकाºयांनी ‘आॅक्टोबरच्या पाणी आरक्षणाच्या वेळी पाहू’ अशी गर्भित धमकी महापालिकेच्या उपायुक्तांना दिली होती. या घटनेला काही दिवस जात नाही तोच राधाकृष्णन् यांनी मंगळवारच्या बैठकीत थेट मुद्द्यालाच हात घातला. महापालिकेची लोकसंख्या किती व दरडोई पाणी वापराचा विचार करता, गंगापूर धरणातून महापालिका दररोज किती पाणी उचल करते? असा प्रश्न पाटबंधारे व महापालिकेला विचारला. त्यावर बैठकीत चर्चा झाली.१३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्तपाणी  वर्षाचा म्हणजेच आॅक्टोबर ते जुलै यादरम्यान महापालिकेला २७०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज असताना महापालिका दरवर्षी ४३०० दशलक्ष घनफूट पाणी उचल करीत असल्याची बाब यानिमित्ताने चर्चिली गेली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी पाण्याची गळती किती व वहन नुकसानीचा विचार करून आणखी ३०० दशलक्ष घनफूट पाणी अतिरिक्त देण्याची तयारी दर्शविली, तरीही महापालिकेला १३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्तपाणी दिले जात असल्याचे लक्षात आल्यावर आॅक्टोबरच्या पाणी आरक्षणात महापालिकेने वस्तुस्थितीदर्शक मागणी नोंदविण्याच्या सूचना केल्या आहेत. गंगापूर धरणातील पाणी जपून वापरल्यास त्याचा उपयोग नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, मनमाड आदी अन्य टंचाईग्रस्त तालुक्यांना करता येईल असा त्या मागचा हेतू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी