शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरणाचे काम युध्दपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 16:54 IST

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली. पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार बुधवार (दि.२०) पासून तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ टाकी स्वच्छता व हातपंप शुध्दीकरण अभियान राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व सुरक्षित पाण्याचा पुरवठा आणि जलजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे गावाला शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा मिळण्यास मदत होईल. दरम्यान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी र्ईशाधीन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमीत शुध्दीकरण करुन जनतेस निर्जंतुक पाणी पुरवठा करण्याबाबत तालुका व ग्रामपंचायत यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे. बुधवारी तालुक्यातील दातली, चिंचोली, मोह, खडांगळी, सोनांबे, मुसळगाव, कारवाडी, देशवंडी, गुरेवाडी, नांदूरशिंगोटे, रामनगर, वडझिरे, भरतपूर, खंबाळे आदिंसह ४० ते ४५ ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच हातपंपाचे शुध्दीकरण करण्यात आले. त्यावर शुध्दीकरण करणाची तारीख नमुद करण्यात आली आहे. यावेळी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, जिल्हा पाणी गुणवता निरिक्षक, विस्तार अधिकारी, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, गटसमन्वयक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षारक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक