शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

बरड्याची वाडीचा पाणीप्रश्न अखेर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:27 IST

वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद‌्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.

ठळक मुद्देवैतरणानगर : श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला अखेर आले यश

वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद‌्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईबाबत गेल्या ३ वर्षांपासून श्रमजीवी संघटनेने सतत आंदोलने, मोर्चे, निवेदन देऊन पाणीप्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले होते. प्रसारमाध्यमांनीदेखील या गावचा ग्राऊंड रिपोर्ट घेत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. लोकसभेच्या निवडणूक काळात राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणून याच वाडीचा पाणीटंचाईचा व्हिडीओ नाशिकच्या जाहीर सभेत दाखवला होता.याबाबत श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर याबाबतीत आमदार हिरामण खोसकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन पाणीप्रश्न सोडवावा म्हणून मागणी केली होती. त्यांनी तत्काळ या योजनेसाठी त्यांच्या विकास निधीमधून १५ लाख रुपये दिले आणि सोमवारी खोसकर यांच्याच हस्ते योजनेचे उद्घाटन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला मिळालेले यश असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोखे यांनी सांगितले.आमदार स्थानिक विकास निधीमधून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १५ लाख, तर डोंगरी विकास निधीमधून ९ लाख ४० हजार रुपये अंगणवाडी इमारतीसाठी दिले असून, या योजनेचे तत्काळ काम सुरू होणार असल्याची माहिती यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, गटविकास अधिकारी किरण जाधव, तानाजी शिद, वसंत इरते, वावीहर्षचे सरपंच बाबूराव बांगारे, ग्रामसेवक राठोड, मांगटे, संतोष निरगुडे, शिवाजी दराने, नवसू गारे, संजय पारधी, लीला पारधी, शंकर पारधी, गेणू पादिर, चिमाबाई शिद, सुरेश बांगारे, नामदेव बांगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गाजला होता. यावेळी अनेक पक्षांनीदेखील या विषयाकडे गांभीर्याने घेण्याचे सुचवले होते आणि सोमवारी त्याचे उदघाटन झाल्याने खऱ्या अर्थाने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.भगवान मधे, जिल्हा सरचिटणीस, श्रमजीवी संघटना 

टॅग्स :water shortageपाणीकपातGovernmentसरकार