शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बरड्याची वाडीचा पाणीप्रश्न अखेर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:27 IST

वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद‌्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.

ठळक मुद्देवैतरणानगर : श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला अखेर आले यश

वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद‌्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईबाबत गेल्या ३ वर्षांपासून श्रमजीवी संघटनेने सतत आंदोलने, मोर्चे, निवेदन देऊन पाणीप्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले होते. प्रसारमाध्यमांनीदेखील या गावचा ग्राऊंड रिपोर्ट घेत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. लोकसभेच्या निवडणूक काळात राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणून याच वाडीचा पाणीटंचाईचा व्हिडीओ नाशिकच्या जाहीर सभेत दाखवला होता.याबाबत श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर याबाबतीत आमदार हिरामण खोसकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन पाणीप्रश्न सोडवावा म्हणून मागणी केली होती. त्यांनी तत्काळ या योजनेसाठी त्यांच्या विकास निधीमधून १५ लाख रुपये दिले आणि सोमवारी खोसकर यांच्याच हस्ते योजनेचे उद्घाटन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला मिळालेले यश असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोखे यांनी सांगितले.आमदार स्थानिक विकास निधीमधून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १५ लाख, तर डोंगरी विकास निधीमधून ९ लाख ४० हजार रुपये अंगणवाडी इमारतीसाठी दिले असून, या योजनेचे तत्काळ काम सुरू होणार असल्याची माहिती यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, गटविकास अधिकारी किरण जाधव, तानाजी शिद, वसंत इरते, वावीहर्षचे सरपंच बाबूराव बांगारे, ग्रामसेवक राठोड, मांगटे, संतोष निरगुडे, शिवाजी दराने, नवसू गारे, संजय पारधी, लीला पारधी, शंकर पारधी, गेणू पादिर, चिमाबाई शिद, सुरेश बांगारे, नामदेव बांगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गाजला होता. यावेळी अनेक पक्षांनीदेखील या विषयाकडे गांभीर्याने घेण्याचे सुचवले होते आणि सोमवारी त्याचे उदघाटन झाल्याने खऱ्या अर्थाने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.भगवान मधे, जिल्हा सरचिटणीस, श्रमजीवी संघटना 

टॅग्स :water shortageपाणीकपातGovernmentसरकार