शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:16 IST

एस. बी. कमानकर सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे ...

एस. बी. कमानकर

सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. गाळ काढण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

गोदाकाठ भागातील जमीन दरवर्षी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. शेतात उभी असलेली पिके खराब होतात. काळी कसदार जमीन आणि नदीलगतचा भाग यामुळे पाणी अनेक महिने शेतात राहाते, त्यामुळे शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. गोदावरी नदीच्या आसपास असणाऱ्या सखोल भागात पाणी जाऊन शेतीचे नुकसान होण्याची घटना ही एक किंवा पाच वर्षांची समस्या नाही तर ती अनेक दशके निरंतर निर्माण होणारी समस्या असूनही ती का निर्माण होते आणि त्यासाठी काय प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्यावर अभ्यास करून उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे; मात्र केवळ गोदावरी नदीला येणारा पूर आणि त्यापासून होणारे तात्पुरते नुकसान या संदर्भात वरवर मलमपट्टी करून समाधान व्यक्त केले जात आहे.

गोदावरी नदीला दरवर्षी पूर येतो. चांगला पाऊस झाला तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा महापूर येतो. पुराच्या पाण्याने गोदाकाठ पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होते. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी नांदुरमधमेश्वर धरणावर सात वक्राकार गेट बसविण्यात आले. वक्राकार गेट झाल्याने काहीअंशी पाणी वाहून जाऊ लागले, पुराचा धोका काही प्रमाणात कमी झाला मात्र धोका टळला नाही. शेतीचे नुकसान जे व्हायचे ते होतच आहे. चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, कोठुरे, शिंगवे, सायखेडा, चांदोरी या गावांतील हजारो हेक्टर शेतीचे आजही नुकसान होत आहे.

-----

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केराची टोपली

धरणावर वक्राकार गेट उभारले; पण गेटच्या मागे धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी गेटजवळ लवकर आणि तितक्या वेगात जात नाही. गेटच्या उंचीपेक्षा गाळाची उंची जास्त आहे, त्यामुळे पाणी गेटजवळ न जाता ते नदीच्या पात्रात पसरते. यासाठी गेटच्या आतील बाजूला असणारा गाळ काढून पाणी गेटजवळ जाण्यासाठी येणारा अडथळा दूर केला तर पाणी जोरदार वाहून जाईल आणि शेतात पसरणार नाही. नदीत वाहत येणारे पाणी जोरात गेटपर्यंत पोहोचले तर शेतात पाणी घुसून शेतीचे नुकसान होण्याची समस्या दूर होईल.

यासंदर्भात शेतकरी, सामाजिक संघटना यांनी खासदार, आमदार, पालकमंत्री यांना अनेक वर्षं निवेदन देत आहे; पण प्रश्न मात्र मार्गी लागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-------------------

चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, शिंगवे, कोठुरे, चांदोरी, सायखेडा या गावांतील नदीलगत असलेल्या भागातील शेतात अनेक वर्ष सातत्याने पावसाळ्यात पाणी येते आणि शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान होते. नांदुरमधमेश्वर धरणाच्या गेटजवळ ज्या प्रवाहात पाणी जायला पाहिजे तितक्या प्रवाहात जात नाही.

- नीलेश दराडे, शेतकरी, चापडगाव (२८ सायखेडा वॉटर)

280821\28nsk_15_28082021_13.jpg

२८ सायखेडा वॉटर