शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:16 IST

एस. बी. कमानकर सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे ...

एस. बी. कमानकर

सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. गाळ काढण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

गोदाकाठ भागातील जमीन दरवर्षी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. शेतात उभी असलेली पिके खराब होतात. काळी कसदार जमीन आणि नदीलगतचा भाग यामुळे पाणी अनेक महिने शेतात राहाते, त्यामुळे शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. गोदावरी नदीच्या आसपास असणाऱ्या सखोल भागात पाणी जाऊन शेतीचे नुकसान होण्याची घटना ही एक किंवा पाच वर्षांची समस्या नाही तर ती अनेक दशके निरंतर निर्माण होणारी समस्या असूनही ती का निर्माण होते आणि त्यासाठी काय प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्यावर अभ्यास करून उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे; मात्र केवळ गोदावरी नदीला येणारा पूर आणि त्यापासून होणारे तात्पुरते नुकसान या संदर्भात वरवर मलमपट्टी करून समाधान व्यक्त केले जात आहे.

गोदावरी नदीला दरवर्षी पूर येतो. चांगला पाऊस झाला तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा महापूर येतो. पुराच्या पाण्याने गोदाकाठ पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होते. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी नांदुरमधमेश्वर धरणावर सात वक्राकार गेट बसविण्यात आले. वक्राकार गेट झाल्याने काहीअंशी पाणी वाहून जाऊ लागले, पुराचा धोका काही प्रमाणात कमी झाला मात्र धोका टळला नाही. शेतीचे नुकसान जे व्हायचे ते होतच आहे. चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, कोठुरे, शिंगवे, सायखेडा, चांदोरी या गावांतील हजारो हेक्टर शेतीचे आजही नुकसान होत आहे.

-----

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केराची टोपली

धरणावर वक्राकार गेट उभारले; पण गेटच्या मागे धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी गेटजवळ लवकर आणि तितक्या वेगात जात नाही. गेटच्या उंचीपेक्षा गाळाची उंची जास्त आहे, त्यामुळे पाणी गेटजवळ न जाता ते नदीच्या पात्रात पसरते. यासाठी गेटच्या आतील बाजूला असणारा गाळ काढून पाणी गेटजवळ जाण्यासाठी येणारा अडथळा दूर केला तर पाणी जोरदार वाहून जाईल आणि शेतात पसरणार नाही. नदीत वाहत येणारे पाणी जोरात गेटपर्यंत पोहोचले तर शेतात पाणी घुसून शेतीचे नुकसान होण्याची समस्या दूर होईल.

यासंदर्भात शेतकरी, सामाजिक संघटना यांनी खासदार, आमदार, पालकमंत्री यांना अनेक वर्षं निवेदन देत आहे; पण प्रश्न मात्र मार्गी लागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-------------------

चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, शिंगवे, कोठुरे, चांदोरी, सायखेडा या गावांतील नदीलगत असलेल्या भागातील शेतात अनेक वर्ष सातत्याने पावसाळ्यात पाणी येते आणि शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान होते. नांदुरमधमेश्वर धरणाच्या गेटजवळ ज्या प्रवाहात पाणी जायला पाहिजे तितक्या प्रवाहात जात नाही.

- नीलेश दराडे, शेतकरी, चापडगाव (२८ सायखेडा वॉटर)

280821\28nsk_15_28082021_13.jpg

२८ सायखेडा वॉटर