शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:16 IST

एस. बी. कमानकर सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे ...

एस. बी. कमानकर

सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. गाळ काढण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

गोदाकाठ भागातील जमीन दरवर्षी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. शेतात उभी असलेली पिके खराब होतात. काळी कसदार जमीन आणि नदीलगतचा भाग यामुळे पाणी अनेक महिने शेतात राहाते, त्यामुळे शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. गोदावरी नदीच्या आसपास असणाऱ्या सखोल भागात पाणी जाऊन शेतीचे नुकसान होण्याची घटना ही एक किंवा पाच वर्षांची समस्या नाही तर ती अनेक दशके निरंतर निर्माण होणारी समस्या असूनही ती का निर्माण होते आणि त्यासाठी काय प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्यावर अभ्यास करून उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे; मात्र केवळ गोदावरी नदीला येणारा पूर आणि त्यापासून होणारे तात्पुरते नुकसान या संदर्भात वरवर मलमपट्टी करून समाधान व्यक्त केले जात आहे.

गोदावरी नदीला दरवर्षी पूर येतो. चांगला पाऊस झाला तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा महापूर येतो. पुराच्या पाण्याने गोदाकाठ पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होते. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी नांदुरमधमेश्वर धरणावर सात वक्राकार गेट बसविण्यात आले. वक्राकार गेट झाल्याने काहीअंशी पाणी वाहून जाऊ लागले, पुराचा धोका काही प्रमाणात कमी झाला मात्र धोका टळला नाही. शेतीचे नुकसान जे व्हायचे ते होतच आहे. चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, कोठुरे, शिंगवे, सायखेडा, चांदोरी या गावांतील हजारो हेक्टर शेतीचे आजही नुकसान होत आहे.

-----

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केराची टोपली

धरणावर वक्राकार गेट उभारले; पण गेटच्या मागे धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी गेटजवळ लवकर आणि तितक्या वेगात जात नाही. गेटच्या उंचीपेक्षा गाळाची उंची जास्त आहे, त्यामुळे पाणी गेटजवळ न जाता ते नदीच्या पात्रात पसरते. यासाठी गेटच्या आतील बाजूला असणारा गाळ काढून पाणी गेटजवळ जाण्यासाठी येणारा अडथळा दूर केला तर पाणी जोरदार वाहून जाईल आणि शेतात पसरणार नाही. नदीत वाहत येणारे पाणी जोरात गेटपर्यंत पोहोचले तर शेतात पाणी घुसून शेतीचे नुकसान होण्याची समस्या दूर होईल.

यासंदर्भात शेतकरी, सामाजिक संघटना यांनी खासदार, आमदार, पालकमंत्री यांना अनेक वर्षं निवेदन देत आहे; पण प्रश्न मात्र मार्गी लागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-------------------

चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, शिंगवे, कोठुरे, चांदोरी, सायखेडा या गावांतील नदीलगत असलेल्या भागातील शेतात अनेक वर्ष सातत्याने पावसाळ्यात पाणी येते आणि शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान होते. नांदुरमधमेश्वर धरणाच्या गेटजवळ ज्या प्रवाहात पाणी जायला पाहिजे तितक्या प्रवाहात जात नाही.

- नीलेश दराडे, शेतकरी, चापडगाव (२८ सायखेडा वॉटर)

280821\28nsk_15_28082021_13.jpg

२८ सायखेडा वॉटर