शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

केळझर डाव्या कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:59 IST

सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देशेतात पाणी : पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गेल्या चार दिवसांपासून गळती लागली आहे. गव्हाणेपाडा, दगडी साकोडा, डांगसौंदाणे, मोरकुरे परिसरात या कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी तब्बल दोन किलोमीटर वरील कालव्याला गळती लागली आहे. यामुळे लाभक्षेत्रातील गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत गुरुवारी (दि.१२) तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता संजय पाटील यांनी गळती लागलेल्या कालव्याची पाहणी केली.यावेळी पिकांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार इंगळे-पाटील यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली.अजून आठ दिवस रब्बी आवर्तनाचे पाणी कालव्यातून गेल्यास बाधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाचे उपअभियंता रौंदळ यांनी शनिवारी (दि.१४) रात्री पाणी बंद करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या असून, येत्या पावसाळ्यापूर्वी कालव्याची गळती काढण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. केळझर डाव्या कालव्याला गळती लागल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पिके बाधित झाली आहेत. येत्या दोन दिवसात तलाठी, जलसंपदा विभागाचा एक अधिकारी आणि कृषी विभागाचा एक कर्मचारी अशा तिघांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे सादर केला जाईल .- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदारकेळझर डाव्या कालवा कालबाह्य झाल्यामुळे नादुरुस्त असून, सुमारे दीड किलोमीटरच्या कालव्याच्या लांबीला गळती लागली आहे. या कालव्याच्या दुरु स्तीसाठी निविदा काढून कामाला सुरु वात करण्यात आली आहे. या दीड किलोमीटर कालव्याला पाइप टाकण्याचे काम सुरु आहे. पाणी बंद झाल्यावर कामाला गती मिळेल.- अभिजित रौंदळ, उपअभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण