शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

केळझर डाव्या कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:59 IST

सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देशेतात पाणी : पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गेल्या चार दिवसांपासून गळती लागली आहे. गव्हाणेपाडा, दगडी साकोडा, डांगसौंदाणे, मोरकुरे परिसरात या कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी तब्बल दोन किलोमीटर वरील कालव्याला गळती लागली आहे. यामुळे लाभक्षेत्रातील गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत गुरुवारी (दि.१२) तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता संजय पाटील यांनी गळती लागलेल्या कालव्याची पाहणी केली.यावेळी पिकांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार इंगळे-पाटील यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली.अजून आठ दिवस रब्बी आवर्तनाचे पाणी कालव्यातून गेल्यास बाधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाचे उपअभियंता रौंदळ यांनी शनिवारी (दि.१४) रात्री पाणी बंद करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या असून, येत्या पावसाळ्यापूर्वी कालव्याची गळती काढण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. केळझर डाव्या कालव्याला गळती लागल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पिके बाधित झाली आहेत. येत्या दोन दिवसात तलाठी, जलसंपदा विभागाचा एक अधिकारी आणि कृषी विभागाचा एक कर्मचारी अशा तिघांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे सादर केला जाईल .- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदारकेळझर डाव्या कालवा कालबाह्य झाल्यामुळे नादुरुस्त असून, सुमारे दीड किलोमीटरच्या कालव्याच्या लांबीला गळती लागली आहे. या कालव्याच्या दुरु स्तीसाठी निविदा काढून कामाला सुरु वात करण्यात आली आहे. या दीड किलोमीटर कालव्याला पाइप टाकण्याचे काम सुरु आहे. पाणी बंद झाल्यावर कामाला गती मिळेल.- अभिजित रौंदळ, उपअभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण