शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

केळझर डाव्या कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:59 IST

सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देशेतात पाणी : पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गेल्या चार दिवसांपासून गळती लागली आहे. गव्हाणेपाडा, दगडी साकोडा, डांगसौंदाणे, मोरकुरे परिसरात या कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी तब्बल दोन किलोमीटर वरील कालव्याला गळती लागली आहे. यामुळे लाभक्षेत्रातील गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत गुरुवारी (दि.१२) तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता संजय पाटील यांनी गळती लागलेल्या कालव्याची पाहणी केली.यावेळी पिकांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार इंगळे-पाटील यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली.अजून आठ दिवस रब्बी आवर्तनाचे पाणी कालव्यातून गेल्यास बाधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाचे उपअभियंता रौंदळ यांनी शनिवारी (दि.१४) रात्री पाणी बंद करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या असून, येत्या पावसाळ्यापूर्वी कालव्याची गळती काढण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. केळझर डाव्या कालव्याला गळती लागल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पिके बाधित झाली आहेत. येत्या दोन दिवसात तलाठी, जलसंपदा विभागाचा एक अधिकारी आणि कृषी विभागाचा एक कर्मचारी अशा तिघांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे सादर केला जाईल .- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदारकेळझर डाव्या कालवा कालबाह्य झाल्यामुळे नादुरुस्त असून, सुमारे दीड किलोमीटरच्या कालव्याच्या लांबीला गळती लागली आहे. या कालव्याच्या दुरु स्तीसाठी निविदा काढून कामाला सुरु वात करण्यात आली आहे. या दीड किलोमीटर कालव्याला पाइप टाकण्याचे काम सुरु आहे. पाणी बंद झाल्यावर कामाला गती मिळेल.- अभिजित रौंदळ, उपअभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण