शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पड रं पाण्या पड पड पाण्या.

By admin | Updated: June 30, 2014 00:25 IST

कोरड्या नभाचा अन् उसवलेल्या भुईचा मन सुन्न करणारा ‘रिपोर्ट’

स्पॉट : चांदवडहोरपळलेल्या जिवांना धास्ती जून महिना संपत आला तरी वरुणराजाचे आगमन नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले असून, अजून काही दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही तर सन १९७२ च्या दुष्काळाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बळीराजा एकीकडे चिंताक्रांत झाला असून, दुसरीकडे पिण्याचे पाणी काही भागातून गेल्या मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गायब झाले आहे. शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत असून, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, डाळींब बागांचे संकट व उशिरा झालेल्या खरिपाच्या पेरण्या यांसारख्या चक्रव्यूहाने बळीराजा चिंताग्रस्त आहे.  सर्वत्र रोहिणी नक्षत्र गेले, मृगही गेले. आता आर्द्रा नक्षत्र लागून पाच दिवस उलटले तरी पावसाने चांदवड तालुक्यात हजेरी लावली नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांत दररोज पावसाने हजेरी लावली, तर वर्षभर बेमोसमी पाऊस पडत होता. पिकांचे नुकसान केले. आता ऐन हंगामात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे यावर्षी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. चांदवड तालुक्यातील अनेक जलाशये व पाणीसाठे असणारी धरणे व पाझर तलावांनी तळ गाठला आहे. पिण्यासाठीच अनेक भागांत पाणी नसल्याने ते शेतीसाठी कोठून मिळणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . दरम्यान, शेतकऱ्यांनी होती नव्हती ती पिके वाचविण्यासाठी विहिरीतील पाणी काढून पिकांना दिले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात लहानमोठे प्लॅस्टिक तळे केले आहे, त्यांनीही आता तळ गाठला आहे. डाळींब व इतर बागांना तर शेतकऱ्यांनी स्वत:च्या विहिरीतील किंवा बोअरवेलमधील पाणी संपल्याने आता टॅँकरने विकत पाणी आणून पिके जगविण्याचा मार्ग पत्करला आहे. आर्द्रा नक्षत्र लागून चार ते पाच दिवस झाले मात्र पावसाचा मागमूसही नाही. त्यात उन्हाळ्यासारखे ऊन रखरखत आहे. सर्वत्र जळालेली पिके, काही ठिकाणी पेरणीसाठी भकास पडलेली जमीन, ओस माळराने, उघडे डोंगर, पाण्याने तळ गाठलेली धरणे, विहिरी यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस पडला नाही तर पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठल्याने आता टॅँकरची संख्या वाढणार आहे. पाण्याच्या शोधात महिला, पुरुष, बालके वणवण फिरत आहेत.स्पॉट : पेठविकतचे पाणी !तब्बल महिन्याचा कालावधी उलटूनही वरुणराजा हजेरी लावत नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट आहे. आधीच दुष्काळाच्या खाईत सापडलेला बळीराजा यामुळे मोठ्या संकटात सापडण्याची भीती आहे़ पेठ तालुक्यात काही ठिकाणी विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाऊस नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत़ शिवाय हाताला काम नसल्याने आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ तालुक्यातील आठ धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत चालल्याने जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल होत चालला आहे़ तालुक्यातील शंभर गावांना टंचाईच्या झळा बसत असताना, पाऊस लांबल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे़स्पॉट : कळवणबिकट वाटअवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर खरीप हंगामात तरी पाऊस येईल अशी अपेक्षा लागून असलेल्या शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. तालुक्यातील चणकापूर धरणात १७, अर्जुन सागर (पुनद) धरणात ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील ११ लघुपाटबंधारे प्रकल्प कोरडेठाक झाले असून, परिस्थिती बिकट झाली आहे. शहरात पाणीटंचाई जाणवत नसली, तरी अन्य भागांत वाईट स्थिती आहे. शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. शहराला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्प आटू लागल्याने ओतूर, गोबापूर, बोरदैवत, धार्डे दिगर, भांडणे, खिराड, मार्कंडपिंप्री प्रकल्पात मृतसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील दहा नळपाणीपुरवठा योजना पूर्ण असून, ४१ योजना तात्पुरत्या स्वरूपात सुरु आहेत. त्यांची किरकोळ कामे अपूर्ण आहेत. २९ योजनांची कामे प्रगतिपथावर सुरु आहेत, तर ३५ योजनांची कामे तांत्रिक मान्यतेसाठी दाखल असल्याने सुरू झालेली नाहीत. धरण उशाशी असूनसुद्धा पुनद लाभक्षेत्रातील बंधारपाडा, औत्यापाणी, चोळीचा माळ, उंबरगव्हाण यांसह अन्य विविध विभागांतील आदिवासी बांधवांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते, हे सत्य नाकारता येत नाही.स्पॉट : सटाणाचिंताच चिंताच् सटाणा तालुक्यातील अनेक भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा आजही कोलमडल्या आहेत, तर हातपंपांवर महिलांची गर्दी वाढत आहे. नळांना आतापर्यंत पाणी येत होते. मात्र जलाशयातील पाण्याचा साठाच संपुष्टात आल्याने टंचाईच्या काळात तर पाणी मिळणे मोठ्या प्रमाणावर दुरापास्त होणार आहे. बागलाण तालुक्यातील अनेक प्रकल्पांनी आज तळ गाठल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे. पेरणी कशी करावी, असा गहन प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी पेरणी आतापर्यंत होऊन गेली होती. आता पावसाचे चिन्हच दिसत नसल्याने पेरणी कोणत्या भरवशावर करावयाची? अशी चिंता लागून आहे. व्यापारी वर्गाने बियाणे खते भरुन ठेवली. मात्र पाऊसच नसल्याने मागणी नाही. पावसाचे आमगन न झाल्यास सन १९७२ पेक्षा भयानक दुष्काळाचा सामना करावा लागेल, अशी भीती जुने जाणकार आजही व्यक्त करीत आहेत.