शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

मनमाड बचाव समितीतर्फे पाणीप्रश्नी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 17:40 IST

मनमाड : नार पारच्या पाण्यासाठी शेतकरी लॉँग मार्चला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देता राज्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील पेठ सुरगाणा या भागातून नार पार, पिंजाळ, दमणगंगा, ताण बाण आदी नद्यांचे पाणी वाहून अरबी समुद्रात जाते. केंद्र शासनाच्या चितळे आयोगाने सर्वेक्षण करून समुद्रात वाहून जाणारे १५७ टीएमसी पाणी नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांना दिल्यास हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याबरोबरच मराठवाडा व नगर जिल्ह्यालाही या पाण्याचा फायदा होणार आहे. मात्र महाराष्टÑ शासन, गुजरात सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार होत असून राज्यातील वाहून जाणारे १५७ टीएसी पाणी गुजरात राज्याला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हक्काचे पाणी महाराष्टÑालाच मिळाले पाहिजे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी किसन सभेने २० फेबृवारीपासून नाशिक ते मुंबई असा लॉँगमार्च काढला आहे. राज्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या या लॉँगमार्चला पाठिंबा व्यक्त करून राज्याला पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीचे पुंडलीक कचरे, रमेश खरे, निवृत्ती खालकर, परशराम शिंदे, योगेश बोदडे, रामदास पगारे, अशोक परदेशी, भाऊसाहेब अहेर आदी सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी