शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:45 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.महापालिकेची धोरणात्मक निर्णयासाठी तहकूब झालेली महासभा मंगळवारी (दि.२५) सकाळी होणार आहे. महापालिकेच्या महासभेत अनेक वादाचे विषय असले तरी शहरवासीयांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा विषय पाणी कपातीचा असणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पाणीसाठा कमी होत आहे. पाऊसदेखील लांबल्याने आता नाशिककरांच्या तोंंडचे पाणी पळाले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी असले तरी धरणातून महापालिकेच्या जलविहिरीपर्यंत पाणी येण्यात खडकाचा अडथळा आहे. महापालिकेने याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, हे काम वेळेत होईल किंवा नाही अशी शंका आहे, त्याचबरोबर दारणा धरणातून प्रदूषित पाणी बंद झाल्यानेदेखील महापालिकेची अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी (दि.२२) महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाच्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळीच पाणीकपातीच्या अनुषंघाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. त्यानुसार ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ आणि एकवेळ पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात कपात करण्याचे नियोजन आहे.कपातीऐवजी हवा निर्जला दिनप्रशासनाच्या वतीने दोन पर्याय देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र कोरडा दिवस किंवा निर्जला दिन करण्यावर भर आहे. एका दिवसात पाणीकपात झाल्यास साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाणी एकाच दिवसात वाचत असल्याने प्रशासनाच्या मतानुसार हाच प्रस्ताव योग्य आहे. मात्र, यापूर्वी एकदा कोरडा दिवस ठेवला की दुसºया दिवशी जलवाहिन्या कोरड्या असतात. त्या भरण्यासाठी वेळ जात असल्याने कोरडा दिवसाच्या दुसºया दिवशीदेखील नागरिकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याने अडचण निर्माण होते. त्यामुळे सहसा नगरसेवक त्यासाठी राजी होत नाही.कटू निर्णय लोकप्रतिनिधींच्या माथीमनपात पाणीकपातीचे अधिकार खरे तर प्रशासकीय असून, ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आयुक्तच घोषित करीत असतात. हा कटू निर्णय असल्याने लोकप्रतिनिधींच्या गळी मारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgangapur damगंगापूर धरणwater shortageपाणीटंचाई