शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाणीकपातीचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:45 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.महापालिकेची धोरणात्मक निर्णयासाठी तहकूब झालेली महासभा मंगळवारी (दि.२५) सकाळी होणार आहे. महापालिकेच्या महासभेत अनेक वादाचे विषय असले तरी शहरवासीयांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा विषय पाणी कपातीचा असणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पाणीसाठा कमी होत आहे. पाऊसदेखील लांबल्याने आता नाशिककरांच्या तोंंडचे पाणी पळाले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी असले तरी धरणातून महापालिकेच्या जलविहिरीपर्यंत पाणी येण्यात खडकाचा अडथळा आहे. महापालिकेने याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, हे काम वेळेत होईल किंवा नाही अशी शंका आहे, त्याचबरोबर दारणा धरणातून प्रदूषित पाणी बंद झाल्यानेदेखील महापालिकेची अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी (दि.२२) महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाच्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळीच पाणीकपातीच्या अनुषंघाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. त्यानुसार ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ आणि एकवेळ पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात कपात करण्याचे नियोजन आहे.कपातीऐवजी हवा निर्जला दिनप्रशासनाच्या वतीने दोन पर्याय देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र कोरडा दिवस किंवा निर्जला दिन करण्यावर भर आहे. एका दिवसात पाणीकपात झाल्यास साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाणी एकाच दिवसात वाचत असल्याने प्रशासनाच्या मतानुसार हाच प्रस्ताव योग्य आहे. मात्र, यापूर्वी एकदा कोरडा दिवस ठेवला की दुसºया दिवशी जलवाहिन्या कोरड्या असतात. त्या भरण्यासाठी वेळ जात असल्याने कोरडा दिवसाच्या दुसºया दिवशीदेखील नागरिकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याने अडचण निर्माण होते. त्यामुळे सहसा नगरसेवक त्यासाठी राजी होत नाही.कटू निर्णय लोकप्रतिनिधींच्या माथीमनपात पाणीकपातीचे अधिकार खरे तर प्रशासकीय असून, ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आयुक्तच घोषित करीत असतात. हा कटू निर्णय असल्याने लोकप्रतिनिधींच्या गळी मारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgangapur damगंगापूर धरणwater shortageपाणीटंचाई