शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने मनमाडकरांवर पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 22:23 IST

मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेचा गलथानपणा : दुरुस्तीचे काम हाती; टंचाईची नागरिकांना भीती

मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले आहे. आवर्तनाचे हे पाणी पाटोदा येथील साठवणूक तलावात घेण्यात आले. अजूनही आवर्तन सुरू आहे. त्यामुळे उर्वरित पाणी वागदर्डी धरणात याच पाइपलाइनने घेतले जात असते.दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामाला ८-१० दिवस लागणार असल्याने मनमाडकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.कातरणी ते वागदर्डीदरम्यान वरील पाइपलाइनमधून ग्रॅव्हिटीने पाणी धरणात येते; पण सध्या या पाइपलाइन दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर आणि युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आवर्तनाचे पाणी वागदर्डी धरणात घेणे शक्य होत नाही. रेल्वेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच मुख्य जलवाहिनी फुटली. सध्या मनमाड शहराला पालखेड कालव्यातून नियमित पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे.या आवर्तनाद्वारे पाटोदा येथील नगरपालिकेचा साठवणूक तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यातही आला. आवर्तनाचे हे पाणी यात पाइपलाइनद्वारे वागदर्डी धरणात घेतले जाते. परंतु पाइपलाइनच नादुरुस्त असल्याने अधिकचे पाणी मनमाडकरांना मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणि ऐन उन्हाळ्यात मनमाडकरांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागू शकतात... अन्यथा पाणीटंचाईची धगदि. ८ मार्च रोजी नगरपालिकेने शहराच्या पाणी वितरणाच्या दिवसात २ ते ३ दिवसांनी वाढ केली. सध्या मनमाडला १५ दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यातून फक्त दोन दिवस पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या वागदर्डी धरणात दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दुरुस्तीचे काम वेगाने, पूर्ण क्षमतेने तातडीने करावे म्हणजे आवर्तनाचे पाणी थेट वागदर्डी धरणात घेणे सुलभ होईल. त्यामुळे पुढील काळात भर उन्हाळ्यात मनमाडकरांना किमान १४ ते १५ दिवसाआड तरी पाणीपुरवठा होईल, अन्यथा पाणीटंचाईचे चटके भविष्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत