शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

जलवाहिनी फुटल्याने मनमाडकरांवर पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 22:23 IST

मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेचा गलथानपणा : दुरुस्तीचे काम हाती; टंचाईची नागरिकांना भीती

मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले आहे. आवर्तनाचे हे पाणी पाटोदा येथील साठवणूक तलावात घेण्यात आले. अजूनही आवर्तन सुरू आहे. त्यामुळे उर्वरित पाणी वागदर्डी धरणात याच पाइपलाइनने घेतले जात असते.दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामाला ८-१० दिवस लागणार असल्याने मनमाडकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.कातरणी ते वागदर्डीदरम्यान वरील पाइपलाइनमधून ग्रॅव्हिटीने पाणी धरणात येते; पण सध्या या पाइपलाइन दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर आणि युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आवर्तनाचे पाणी वागदर्डी धरणात घेणे शक्य होत नाही. रेल्वेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच मुख्य जलवाहिनी फुटली. सध्या मनमाड शहराला पालखेड कालव्यातून नियमित पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे.या आवर्तनाद्वारे पाटोदा येथील नगरपालिकेचा साठवणूक तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यातही आला. आवर्तनाचे हे पाणी यात पाइपलाइनद्वारे वागदर्डी धरणात घेतले जाते. परंतु पाइपलाइनच नादुरुस्त असल्याने अधिकचे पाणी मनमाडकरांना मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणि ऐन उन्हाळ्यात मनमाडकरांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागू शकतात... अन्यथा पाणीटंचाईची धगदि. ८ मार्च रोजी नगरपालिकेने शहराच्या पाणी वितरणाच्या दिवसात २ ते ३ दिवसांनी वाढ केली. सध्या मनमाडला १५ दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यातून फक्त दोन दिवस पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या वागदर्डी धरणात दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दुरुस्तीचे काम वेगाने, पूर्ण क्षमतेने तातडीने करावे म्हणजे आवर्तनाचे पाणी थेट वागदर्डी धरणात घेणे सुलभ होईल. त्यामुळे पुढील काळात भर उन्हाळ्यात मनमाडकरांना किमान १४ ते १५ दिवसाआड तरी पाणीपुरवठा होईल, अन्यथा पाणीटंचाईचे चटके भविष्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत