शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
5
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
6
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
7
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
8
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
9
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
10
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
11
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
12
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
13
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
14
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
15
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
16
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
17
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
18
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
19
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
20
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची वहिवाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 02:15 IST

यंत्रणेने मनावर घेतले तर काय घडून येऊ शकते याचे उदाहरण म्हणून जलयुक्तच्या कामांकडे पाहता यावे. शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘युती’ सरकारच्या काळात हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत संपूर्ण राज्यातच मोठे काम घडून आले असून, नाशिक महसूल विभागातही सुमारे ९८ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली गेल्याने यापुढील काळात टंचाईच्या तक्रारी दूर होण्याची अपेक्षा करता यावी.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानाला सर्वत्रच चांगला प्रतिसाद उपसला गेलेला गाळ शेतकºयांनी आपापल्या शेतासाठी वापरल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासही

यंत्रणेने मनावर घेतले तर काय घडून येऊ शकते याचे उदाहरण म्हणून जलयुक्तच्या कामांकडे पाहता यावे. शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘युती’ सरकारच्या काळात हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत संपूर्ण राज्यातच मोठे काम घडून आले असून, नाशिक महसूल विभागातही सुमारे ९८ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली गेल्याने यापुढील काळात टंचाईच्या तक्रारी दूर होण्याची अपेक्षा करता यावी.आघाडी सरकारच्या काळातील योजनेला नवे रूपडे-टोपडे घालून पुढे आणल्या गेलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला सर्वत्रच चांगला प्रतिसाद लाभल्याचे चित्र आहे. ‘युती’ सरकारनेही गांभीर्याने याकडे लक्ष पुरवले व पाठपुरावा करून कामे पूर्ण करवून घेतली हे मान्य करायलाच हवे. विशेषत: खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत आग्रही आहेत. त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत वेळोवेळी आढावा घेतला त्यामुळेही या कामांना चालना मिळाली. नाशिक विभागात सुमारे ८५० गावांमधील वीस हजारांपेक्षा अधिक कामांचे नियोजन होते, त्यापैकी तब्बल ९८ टक्के कामे सुरू करण्यात आली असून, १५ हजारांवर कामे पूर्णही झाली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात त्यामुळे परिणामकारकपणे जलसंचय व सिंचन होणे अपेक्षित आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अलीकडील काळात भूजल पातळी खालावत चालली आहे. शेतशिवारावर व पाण्याच्या उपलब्धतेवरही त्यामुळे परिणाम होत आहे. यात भरीसभर म्हणून, धरणांसह जे लहान-मोठे प्रकल्प आहेत त्यातील गाळ वाढलेला असल्याने जलसाठा कमी होत असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन भूजल पातळी उंचावण्यासाठी व प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ उपसण्यासारखी योजना राबवून शिवार जलयुक्त करण्यावर भर दिला गेला. गाळमुक्त धरण योजनेत नाशिक विभागातील तब्बल ७२.६१ लाख घनमीटर गाळाचा उपसा केला गेल्याने सुमारे सात हजारापेक्षा अधिक टीसीएम पाणीसाठा तयार झाला आहे. उपसला गेलेला गाळ शेतकºयांनी आपापल्या शेतासाठी वापरल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत घडून आली आहे. आता प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याने पाणीटंचाईवर नियंत्रण तर मिळवता येईलच; पण जमिनीतील पाण्याची पातळी उंचावण्याने उत्पादकतेवरही त्याचा परिणाम अपेक्षित आहे. या योजनांमध्ये लोकसहभागही मोठा लाभला, त्यामुळेच ही कामे पूर्णत्वास जाऊ शकली आहेत. याकरिता यापूर्वीचे नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, त्यांच्यानंतर आलेले महेश झगडे व विद्यमान राजाराम माने यांनी केलेला पाठपुरावादेखील महत्त्वाचाच ठरला. सरकारी योजना या कागदावरच राहात असल्याची आजवरची परिपाठी त्यागून ‘जलयुक्त’कडे गांभीर्याने लक्ष दिले गेल्यानेच हे काम उभे राहू शकले. यात दुग्धशर्करा योग असा की, पानी फाउण्डेशन व जैन संघटनांसारख्या समाजसेवी संस्थांनीही पुढे होत लोकसहभागातून कामे केलीत. एक उपयुक्त लोकचळवळच त्यातून उभी राहीली. टँकरमुक्तीच्या दिशेने पडलेली ही पावले समस्यांच्या निराकरणाची आदर्श वहिवाट घालून देणारीच ठरावी.