शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

कारसुळ नारायण टेंभीच्या पुलावरून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 20:48 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.

ठळक मुद्देदोन गावाचा संपर्क तुटला : अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.पुलावरून पाणी गेल्यास शेतक-यांना शेतात जाता येत नाही. विद्यार्थ्यांची शाळेला दांडी पडते तर अनेकांचा रोजगार बुडतो. पुलाची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार तक्र ारी करूनही त्याची योग्य दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात या पुलावरून ये-जा करणारी व प्रवासाचे प्रमुख माध्यम असलेली एसटी बस कारसुळ गावात येते पण पुलावरून पाणी असल्याने नारायण टेम्भी येथील गावकर्यांना बसची सेवाही खंडीत होते. या दोन्ही गावात पराशरी व काजळी या नद्यांचे संगम होऊन त्या तिसर्या कादवा नदीला मिळतात यामुळे तीन नद्यांचे संगम असलेले हे दोन्ही गावांमध्ये पावसाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या नद्यांना जलप्रवाहाला पावसात मोठा वेग असतो. मुसळधार पाऊस झाल्यास पुलावरून पाणी जाते. त्यामुळे पुलाशी जोडलेल्या या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो.काजळी नदीवरील हा पूल जुना आहे. मो-यांवर हा पूल बांधण्यात आला आहे. नदीच्या पाण्यातून केवळ पाच फूट उंचीवर हा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलालगतच पाणी जाते. पुलाच्या टोकाजवळ रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने रस्ता खड्डयÞांत गेला आहे. पूलही ठिकठिकाणी खचला आहे. माध्यमिक शाळा कारसुळ या गावी असल्याने नारायण टेम्भी येथील शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून शैक्षणकि नुकसान होऊ नये म्हणून या पुलावर जावे लागते .त्यामुळे पाणी वाढून कधीही मोठी हानी होईल , अशी भिती आहे. या बाबत नारायण टेंभी येथील सरपंच अजय गवळी यांनी वेळीवेळी ग्रामसभेत ठराव केला होता. व नवा पूल बांधून द्यावा, अशी मागणी केली होती. नारायण टेम्भी येथील शाळेत जाणार्या मुलांच्या ऊंच्या वाढल्या पण या दोन्ही गावांना जोडणार्या या नदीवरील पुलाची उंची काही वाढली नाहीमात्र संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनाचा जीव गेल्यावरच या विभागाला जाग येतेकी काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे.कोट....आमदार खासदार यांना वेळोवेळी सांगूनही या नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही आजपर्यंत फक्त येथील विद्यार्थी ,ग्रामस्थ व शेतकर्यांना आश्वासन मिळाले पण आता नविनर्वाचित आमदारांकडू या दोन्ही गावांना जोडणार्या पुलाची उंची वाढेल अशी नकीच अपेक्षा आहे- अजय गवळी,नारायण टेम्भी सरपंच 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी