शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

रेशन वाहतूक ठेकेदारावर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:41 IST

‘लोकमत’मध्ये यासंदर्भात मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुरवठा खात्याने ठेकेदाराला याबाबत विचारणा केली आहे.

ठळक मुद्दे कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त ३० किलोपर्यंतचे धान्य कमी दिले जात दुकानदारांना कमी धान्य देण्याच्या कारणाचा मात्र उलगडा झालेला नाही

नाशिक : वाहतूक ठेकेदाराकडून रेशन दुकानदारांना कमी धान्य दिले जात असेल तर दुकानदारांनी थेट तक्रार करावी. तक्रार प्राप्त झाल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी कासार यांनी दिला आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुरवठा खात्याने ठेकेदाराला याबाबत विचारणा केली आहे.शहरातील अनेक धान्य दुकानांना अन्नधान्य पुरविताना वाहतूक ठेकेदाराकडून कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त ३० किलोपर्यंतचे धान्य कमी दिले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. कमी धान्य देऊनही ठेकेदाराकडून पोहोच पावतीवर पूर्ण धान्य मिळाल्याची नोंद करण्यासाठी दुकानदारांना भाग पाडले जाते. त्यासंदर्भात दुकानदारांकडून विचारणा झाल्यास पुरवठा खात्याकडे तक्रारी करा, असा उलट सल्ला ठेकेदाराकडून दिला जात असल्याचेही दुकानदारांचे म्हणणे आहे. प्रत्येक दुकानदाराला धान्य कमी मिळत आहे. दुसरीकडे शासनाकडून मंजूर धान्याचा पुरेपूर साठा ठेकेदाराच्या ताब्यात दिला जात असतानाही दुकानदारांना कमी धान्य देण्याच्या कारणाचा मात्र उलगडा झालेला नाही. त्यामुळे दर महिन्याला शेकडो क्विंटल धान्याचा घोळ घातला जात असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कासार यांनी, दुकानदारांनी जेवढे धान्य मिळेल तेवढ्याच धान्याची पोहोच ठेकेदाराला द्यावी. कोणत्याही परिस्थितीत कमी धान्य घेऊ नये, असे आवाहन केले आहे. दुकानदारांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, ज्या दुकानदारांना कमी धान्य मिळाले त्यांनी नि:संकोचपणे तक्रार करावी. प्रसंगी ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शहरातील ९६ रेशन दुकानदारांकडे असलेल्या अंत्योदय योजनेच्या लाभार्थींसाठी ११७ क्विंटल साखर वाटप करण्यासाठी वाहतूक ठेकेदाराकडे देण्यात आली व त्याने संपूर्ण साखर वाटप केली आहे. त्यामुळे ज्या दुकानदारांना अजूनही साखर मिळालेली नसेल त्यांनी थेट तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्न