शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 01:49 IST

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा धास्तावला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राच्या हवामानावर देखील प्रतिकूल परिणाम जाणवणार आहे. यामुळे मुंबईच्या कुलाबा येथील वेधशाळेने सोमवारपासून (दि.७) बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

ठळक मुद्देतीन दिवस संकटाचे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

नाशिक : जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा धास्तावला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राच्या हवामानावर देखील प्रतिकूल परिणाम जाणवणार आहे. यामुळे मुंबईच्या कुलाबा येथील वेधशाळेने सोमवारपासून (दि.७) बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

एकूणच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग घोंगावू लागले आहे. रविवारी (दि.६) शहराचे कमाल तापमान ३३.५ अंश इतके तर किमान तापमान १६.१ अंश इतके नोंदविले गेले. शहराच्या वातावरणामध्ये उकाडा वाढत असताना पुन्हा मेघगर्जनेसह काही ठरावीक भागाला अवकाळी पाऊस झोडपण्याची शक्यता पुढील तीन दिवसांत वर्तविली गेली आहे. बदलत्या हवामानाचा फटका सातत्याने कृषी क्षेत्राला बसत आहे. फेब्रुवारीनंतर पुन्हा अवकाळी पावसाच्या संकटाची टांगती तलवार आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. ऐन रब्बीची पिके हाती आलेली असताना अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर, मन्नारची खाडी आणि तामिळनाडूसह दक्षिण आंध्रप्रदेश समुद्रकिनाऱ्याजवळ ७ मार्चपर्यंत स्थिती उग्र राहणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस पाऊस होऊ शकतो. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह सरींचा वर्षाव होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस