शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जीवनात विशाल दृष्टिकोन हवा :  बाभूळगावकर शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:14 IST

सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले.

नाशिक : सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले.नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने माडसांगवी (ता. नाशिक) येथे शनिवारी (दि. ३१) आयोजित भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती उत्सवातील धर्मसभेत शास्त्रीजी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आचार्यप्रवर महंत नागराज शास्त्री, आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, महंत सुभद्राबाई शास्त्री कपाटे, महंत संतोषमुनी कपाटे, महंत भीष्माचार्य बाबा, महंत चक्रपाणी बाबा कोठी आदी उपस्थित होते. याप्रसंगी महंत बाभूळगावकर शास्त्री यांनी सांगितले की, श्री चक्रधर स्वामी यांनी बाराव्या शतकात सर्व समाजांतील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आनंद प्राप्तीसाठी मोहमाया यांचा त्याग करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी महंत सुकेणेकर शास्त्री यांनी विचार मांडले.दरम्यान, श्री चक्रधर स्वामी जयंती महोत्सवानिमित्त सकाळी देवास मंगल स्नान, भगवत गीता पाठ, आदी कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर संत- महंताच्या हस्ते ध्वजारोहण व सभा मंडपाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक वामनराव आवारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. अर्जुनराज सुकेणेकर यांनी आभार मानले. दरम्यान, सर्व महंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोपीराज शास्त्री सुकेणेकर, राजधरदादा सुकेणेकर, दामोदर अण्णा महानुभाव, महंत गोविंदराज अकुंळनेरकर, महंत अंजनगावकर बाबा, पोपटराव गायकवाड, प्रभाकर कातकाडे आदी उपस्थित होते.विशेष कार्य सेवा पुरस्कार सोहळाजिल्हा महानुभाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच नागदेवाचार्य विशेष कार्य सेवा गौरव पुरस्कार देऊन अर्जुनराव सुकेणेकर, दौलतराव मोरे, सुखदेव केदारे यांचा गौरव करण्यात आला, तर वामनमुनी अंकुळनेरकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक