शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पाण्यासाठी जनावरांची भटकंती

By admin | Updated: May 12, 2016 00:41 IST

पाण्यासाठी जनावरांची भटकंती

लक्ष्मण सोनवणे ल्ल बेलगाव कुऱ्हेइगतपुरी तालुक्यात दुष्काळाची कोरडी छाया नागरिकांची तडफड वाढवत आहे. दुष्काळी परिस्थितीने आता भयंकर पाय पसरले आहेत. पाण्याचा ठणठणात जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आल्याने दुष्काळ आता त्यांचा वैरी होऊन बसला आहे.तालुक्यातील १२६ महसुली गावांत एकूण पशुधनाची संख्या जास्त आहे. गायी ४४ हजार २९० आहेत, तर म्हैस- २२ हजार ९११, शेळ्या० १९ हजार ४२७, मेंढ्या- ४०, घोडे- ४९, कोंबड्या- ३९ हजार ५७३ आहेत. त्यात शेळ्या, मेंढ्या, म्हैस आदि जनावरे पशुपालकांनी पाळलेली आहेत. त्यांच्यासाठी चारा व पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याचे भयाण चित्र दिसत आहे. याबरोबरच वन्यप्राण्यांवरदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनादेखील दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे. तालुक्यात चाराटंचाईमुळे शेतकरी दुचाकीवरून मिळेल त्या ठिकाणावरून चारा विकत आणत आहेत. काही शेतकरी १६०० रुपये ट्रॅक्टरप्रमाणे गवत विकत घेतात, तर पैशाअभावी तेही मोजक्या शेतकऱ्यांना गवत घेता येते.प्रत्येक वर्षी निसर्ग बदलत असल्याने उष्णता वाढत आहे. तालुक्यातील तपमान ४० अंश किंवा त्याहून अधिकच आहे. त्या तुलनेत पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्ष चांगले होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाला आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. इगतपुरी तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाई यावर चर्चा, बैठका, नियोजन अजूनही झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. पाणीबचतीसाठी कठोर धोरण अवलंबावे लागणार आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर केवळ आता वरवरचे उपाय करून भागणार नाही, तर कायमस्वरूपी एखाद्या योजनेची गरज आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे व तो जमिनीत जिरविण्यासह कूपनलिका खोदून जमिनीची होणारी चाळण थांबवावी लागेल. असे उपाय केल्याशिवाय दुष्काळावर मात करणे शक्य होणार नाही.