शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तळवाडेला पाण्याच्या टॅँकरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 17:04 IST

प्रस्ताव सादर : प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थ संतप्त

ठळक मुद्देसात दिवस होऊनही गावात पाणी मिळत नाही, एक थेंब पाणी मिळत नसल्याने शिवारात अनेक कोस महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे गावात पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरु करावा यासाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून पंधरा दिवस उलटून गेले आहे तरी प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने गावातील महिलांनी अखेर निफाड तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच लता सांगळे यांनी दिली आहे.तळवाडे ग्रामपंचायतीने ४ मे रोजी टँकर सुरु करावा यासाठी निफाड पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर गावातील बोअरवेल ,विहीर अधिग्रहण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. परंतु, केवळ पाच दिवस पाणी पुरेल असे पत्र ग्रामपंचायतीने सादर केले. ९ मे पर्यंत गावातील विहिरीचे पाणी पुरले,त्यानंतर एक बोअरवेल घेतले परंतु पाण्याचा थेंबही लागला नाही. सात दिवस होऊनही गावात पाणी मिळत नाही, एक थेंब पाणी मिळत नसल्याने शिवारात अनेक कोस महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात तात्काळ टँकर सुरु झाला नाही तर गावातील महिलांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता न्यायालय, मंत्रिमंडळाने अनेक अटी शिथिल करून नागरिकांना पाणी आणि जनावरांसाठी छावणी सुरु करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा प्रशासन देखील टँकरचे प्रस्ताव त्वरित मान्य करून नागरिकांना पिण्याचे पाणी तात्काळ मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात प्रस्तावास मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत आहे. एकीकडे दुष्काळाशी सामना करण्यासाठी सरकार सज्ज असतांना निफाड तालुका मात्र टॅँकरच्या प्रतीक्षेत असल्याचे सरपंच लता सांगळे यांनी म्हटले आहे.गावात पाण्याचा थेंब नाहीगावात पाणी टँकर सुरु करावा , असा प्रस्ताव पंचायत समितीत सादर केला परंतु, अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. आठ दिवस झाले. गावात पाण्याचा थेंब नाही. सरकार एकीकडे मागेल त्याला टँकर देण्याची घोषणा करते, आचार संहिता शिथिल करते पण तालुका प्रशासन पाण्याचा टँकर सुरु करत नाही. ही खेदजनक बाब आहे.- लता सांगळे, सरपंच, तळवाडे

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी