शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कोरड्या पडलेल्या कादवा नदीला पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 00:56 IST

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडे पडले असून, पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे ओझे, करंजवण, लखमापूर, म्हैळूस्के या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी करंजवण धरणातून कादवा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी कादवा नदी परिसरातील गावांमधून होत आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : अंत्यसंस्कारासह पिंडदानालाही नाही थेंबभर पाणी

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडे पडले असून, पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे ओझे, करंजवण, लखमापूर, म्हैळूस्के या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी करंजवण धरणातून कादवा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी कादवा नदी परिसरातील गावांमधून होत आहे.एक महिन्यापूर्वी कादवा नदीत सोडलेले पाणी बंद करण्यात आले व नंतर आठ दिवसातच कादवा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच काही ठिकाणी कादवा नदी पात्रालगत गावाला पाणीपुरवठा करणारी पाणी योजना आहे. त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी कमी पडले आहे. त्याचप्रमाणे सध्या कादवा नदी परिसरामधील गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार वारंवार हात -पाय धुण्यासाठी जास्त पाण्याचा वापर होत आहे. म्हणूनच कादवा नदीपात्रात मागणी सोडण्याची आवश्यकता आहे.विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यापासून करंजवण, ओझे, म्हैळूस्के, लखमापूर परिसरामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अंत्यसंस्कारासह दशक्रियाला पिंडदानासाठीही पाणी शिल्लक नाही.उशाला धरण, पायथ्याला नदी... तरीही गावे पाण्यावाचून उपाशी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. येथील आमदार व विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कोरड्या पडलेल्या कादवा नदीपात्रात पाणी सोडून तालुक्यातील गावांना न्याय द्यावा, अशी मागणी कादवा परिसरातून होत आहे. 

टॅग्स :riverनदीWaterपाणी