शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परिपूर्ण पाणीयोजनेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:34 IST

चांदवड :  सातत्याने दुष्काळ चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पूजला आहे. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात होत नाही, मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त व्हायचा असेल तर ४४ गाव नळयोजना व ४२ गाव नळयोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासुद्धा परिपूर्ण असल्यास तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त होईल.

चांदवड (महेश गुजराथी ) सातत्याने दुष्काळ चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पूजला आहे. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात होत नाही, मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त व्हायचा असेल तर ४४ गाव नळयोजना व ४२ गाव नळयोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासुद्धा परिपूर्ण असल्यास तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त होईल.मागील वर्षी पावसाळ्यात बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच चांदवड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यात जाणवणारी टंचाई यंदा फारशी जाणवली नाही. तालुक्यातील बव्हंशी जलाशयांमध्ये जून महिना अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात खोकड तलाव, वागदर्डी धरणाबरोबरच राहुड, जांबुटके, केद्राई (खडकओझर), दरसवाडी या जलाशयांचा समावेश आहे. त्यामुळे एप्रिल व मे अखेर चांदवड तालुक्यात टंचाईचे चित्र फारसे जाणवले नाही.गेल्या वर्षी मे महिन्यात याच तारखेपर्यंत चांदवड तालुक्यात १२ गावे व ४६ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. दररोज १३ टॅँकरद्वारे ३५ फेºया मारण्यात येत होत्या. तर मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बºयाच गावातील विहिरी, बोअरवेल्स, जलसाठे कोरडेठाक पडल्याने व त्यापूर्वीच्या वर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यातुलनेत यंदा परिस्थिती बºयापैकी आहे.जलयुक्त शिवार योजनेची कामे चार वर्षांत चांगली झाल्याने यावर्षी पाहिजे तेवढी टंचाई जाणवत नसल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी दिली. त्यांच्या मते सद्यस्थितीत केद्राई (खडकओझर) व राहुड एम.आय. धरणात १० जूनपर्यंत पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध आहे, तर जांबुटके, दरसवाडी या धरणाची हीच परिस्थिती आहे. सद्यस्थितीत कोणत्याही गावातून पाणीटंचाईबाबत मागणी नाही किंवा तसा प्रस्तावही अद्यापपर्यंत नाही तथापि ग्रामपंचायतीमार्फत यापुढे प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याबाबत तातडीने उपाययोजना करून आवश्यकतेनुसार प्रथम विहीर अधिग्रहण किंवा टँकरबाबत उपाययोजना करण्यात येतील. तालुक्यातील सध्या एकाही गावाला सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. कोणत्या गावाची मागणी नाही, मात्र मे अखेर ही मागणी वाढण्याची शक्यता आहे.-----------------------कोरोनामुळे रखडली शहराची योजनामागील काळात पाणीटंचाई होती, मात्र चांदवड तालुक्यातील सुमारे ७२ गावांना आज तरी ओेझरखेड धरणावरुन पाणीपुरवठा होत आहे. आता तर चांदवड शहरासाठी गेल्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या रेट्यामुळे चांदवड शहरासाठी स्वतंत्र अशी ६८ कोटी रुपयांची पाणी योेजना मंजूर करुन दिली आहे. या योजनेचे काम प्रगतिपथावर असून, लॉकडाउनमुळे सदर योजना थांबली आहे, पण साधारण सप्टेंबर २०२० पर्यंत ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत अस्तित्वातील ४४ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे या उन्हाळ्यात अखेरपर्यंत शहराला व तालुक्यातील इतर गावांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.--------------------------------चांदवड तालुक्यातील एकूण ११२ गावांपैकी ओझरखेड धरणावरुन ६८ ते ७२ व नाग्यासाक्या धरणावरुन १६ अशा एकूण ८४ गावांना व वाड्यांना पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान १६ गावांची योजना वीजबिल भरले नसल्याने बंद आहे. त्यावर लवकरच मार्ग निघेल. या दोन्ही योजनांमुळे चांदवड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवळण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षी व यंदाही जलयुक्त शिवारची कामे मार्गी लागल्याने व पाऊस चांगला झाल्याने टंचाई फारशी जाणवत नाही. तरीसुद्धा प्रमुख धरणातील पाणीसाठा उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत टिकावा यासाठी अवैध कनेक्शन बंद करणे, सिंगल फेज लाइन सुरू ठेवणे तसेच धरण परिसरामधील अवैध उपसा रोखण्यासाठी त्याचे काठावर पोकलेनने चर खोदणे यासारखे उपाय केले जात आहेत. टंचाईत मागणी आल्यास प्रथम विहीर अधिग्रहित करणे नंतर टॅँकरने पाणीपुरवठा केला जाईल.- प्रदीप पाटील, तहसीलदार चांदवड------------------------------------------------चांदवड तालुक्यातील ४२ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तालुक्यातील १६ गावे आहेत. वीजबिल थकल्यामुळे योजनेतून पाणीपुरवठा होत नाही. सुमारे दीड लाख रुपये थकीत आहे. हा प्रश्न लवकर मिटावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे तथापि मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे कोणत्याच गावात पाणीटंचाईबाबत समस्या सध्या तरी नाही. तर दरेगाव येथील सरपंच यांनी त्यांच्या स्तरावर स्थानिक विहिरीतून पाणीपुरवठा सुरू केलेला आहे.- महेश पाटील, गटविकास अधिकारी, चांदवड

टॅग्स :Nashikनाशिक