शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वसाका ऊस पुरवठादारांना पेमेंटची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:02 IST

लोहोणेर : डी.व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

लोहोणेर : डी.व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.ऐन दुष्काळी परिस्थितीत सुमारे १२ ते १४ महिने जतन केलेला ऊस शेतकºयांनी वसाकाला पुरवला. दरम्यान, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व संचालक मंडळाने कारखान्याच्या बॉयलर व गव्हाण पूजनाच्या दिवशी शेतकºयांना आश्वस्त केले होते. नाशिक जिल्ह्यातील अन्य कारखाने जो भाव देतील त्यापेक्षा किमान एक रु पया तरी जास्त भाव देण्यात येईल. तसेच उस गाळपास आल्याबरोबर काट्यावर धनादेशाने पेमेंट अदा केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आलेहोते.सुरुवातीला १५ दिवस काट्यावर रोख २००० रुपये प्रतिटन प्रमाणे बिल अदा केले गेले असले तरी शेजारील द्वारकाधीश कारखान्याने मात्र २३७० रुपये प्रती टनाप्रमाणे ऊस बिल अदा केले. त्यामुळे वसाकाला ऊस पुरवठा केलेल्या शेतकºयांनी वरील ३७१ रुपयांची मागणी केली असता बँक उचल देत नसल्याचे कारण पुढे करत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.जानेवारीनंतर पुरवठा केलेल्या उसाचे पेंमेट अद्याप ही शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाले नसून कारखान्याने अदा केलेले ऊस बिलांचे धनादेश वटत नसल्याची तक्रार साक्री तालुक्यातील मलाजे येथील ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र आनंदा सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान, वसाका कामगारांच्या काम बंद आंदोलनास देखील सुमारे १५ दिवसाचा कालावधी उलटला तरी अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.कायदेशीर कार्यवाही करणारकाही शेतकºयांचे धनादेश वटत नसल्यामुळे कारखाना प्रशासना विरोधात असंतोष निर्माण झाला असून, वसाकास पुरवठा केलेल्या उसाचे बिल अदा न केल्यास व धनादेश न वटल्यास कायदेशीर कार्यवाहीचा इशारा ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, राजेंद्र सोनवणे, लक्ष्मण निकम, राजेंद्र जाधव, त्र्यंबक पवार आदी ऊस उत्पादकांनी दिला आहे.