शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:04 IST

जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही,

ठळक मुद्देआॅक्टोबर महिन्याची नाही नुकसान भरपाई : त्यात पुन्हा नुकसानीची भरसर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात

नाशिक : आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतक-यांना शासनाकडून भरपाई मिळण्याची प्रतिक्षा कायम असताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्व दूर बसरणाºया पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायचे किंवा नाही याबाबत शासन पातळीवर अद्याप कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नुकसान झालेले शेतकरी गर्भगळीत झाले आहेत.नाशिक जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतक-यांना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही, परिणामी शासनाकडून आॅक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्यापही दिलासा दिलेला नाही. जवळपास ५० हजार शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणातील बदल रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम करू लागले आहे. अशातच मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात सापडल्या तर शेतात काढून ठेवलेला मका व बाजरीचे नुकसान झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवस हवामान खराब राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शासन पातळीवर तसे कोणतेही आदेश अद्याप देण्यात आलेले नसल्याने यंत्रणा हातावर हात धरून बसली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक