शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:04 IST

जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही,

ठळक मुद्देआॅक्टोबर महिन्याची नाही नुकसान भरपाई : त्यात पुन्हा नुकसानीची भरसर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात

नाशिक : आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतक-यांना शासनाकडून भरपाई मिळण्याची प्रतिक्षा कायम असताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्व दूर बसरणाºया पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायचे किंवा नाही याबाबत शासन पातळीवर अद्याप कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नुकसान झालेले शेतकरी गर्भगळीत झाले आहेत.नाशिक जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतक-यांना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली नाही, परिणामी शासनाकडून आॅक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्यापही दिलासा दिलेला नाही. जवळपास ५० हजार शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणातील बदल रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम करू लागले आहे. अशातच मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागा संकटात सापडल्या तर शेतात काढून ठेवलेला मका व बाजरीचे नुकसान झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवस हवामान खराब राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शासन पातळीवर तसे कोणतेही आदेश अद्याप देण्यात आलेले नसल्याने यंत्रणा हातावर हात धरून बसली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक