शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:22 IST

जऊळके नेऊर : पालखेडच्या आवर्तनाकडे लक्ष

ठळक मुद्देउन्हाळ्यात या गावांना टॅँकरने पाणीपुरवठा किंवा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातून तलाव, बंधारे भरु न घ्यावे लागतात.

जळगाव नेऊर : ग्रामीण भागात विहिरी, कूपनलिका, बोअरवेल यासारखे जलस्त्रोत आटत चालल्याने ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तासनतास उभे राहून हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.तालुक्यात अनेक गावांत ३८ गाव नळपाणी पुरवठा योजना सुरळीत चालू आहे पण अनेक गावे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या गावातील बंधारे,नदी, नाले, ओढे वाहिले तर या गावातील पाणी पुरवठा योजना ठराविक दिवसांपर्यंत चालतात. पण उन्हाळ्यात या गावांना टॅँकरने पाणीपुरवठा किंवा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातून तलाव, बंधारे भरु न घ्यावे लागतात. यावर्षी मात्र पावसाचे जमिनीतून पाणीच न निघाल्याने गावाबरोबर वाडी-वस्त्याही पाण्याने व्याकुळ झालेल्या आहे. आता पालखेड डावा कालव्याच्या येणाऱ्या आवर्तनातून येथील बंधारे भरु न दिल्यास या गावातील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. पश्चिम भागातील जऊळके येथील बंधारा पावसाळ्यात पालखेड डावा कालव्याच्या ओव्हर फ्लो आवर्तनातुन भरला होता. त्यावर चार पाच महिने बोअरवेलवर पाणीपुरवठा झाला,पण दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालल्याने बोअरवेलच्या थोड्या फार प्रमाणात येणाऱ्या पाण्यावर महिलांना तासनतास उभे राहून हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.पाणी प्रश्न सुटण्यास मदत गेली तीन वर्षे गावातील पाणीपुरवठा सुरळीत होता. गावातील बंधारा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातुन आरक्षित केल्याने दरवर्षी बंधारा भरला जातो. पाण्याची पातळी खालावत चालल्याने थोड्याफार प्रमाणात येणा-या पाण्यावर गावाची तहान भागवावी लागत आहे, पालखेड डावा कालव्याच्या येणा-या आवर्तनातून आरक्षित बंधारा भरणार असल्याने पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.- भाऊराव जाधव , ग्रामपंचायत सदस्य,जऊळके 

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई