शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

येवल्यातील शेतकऱ्यांना पालखेडच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 28, 2015 23:11 IST

दुष्काळ : रब्बीच्या पिकासाठी बळीराजाची धडपड

येवला :तालुक्याच्या दक्षिण पश्चिम पट्ट्यातील पालखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, ज्वारी या सारखी पिके जगविण्यासाठी कालव्याचे नियमित रब्बी आवर्तन सोडावे, अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे यांनी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे केली आहे. शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्यासह शेतकरी आता पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनासाठी सरसावले आहेत.तालुक्यातील ४८ हजार हेक्टर जमिनीला पालखेड कालव्याचे पाणी मिळते. त्यासाठी ८७ पाणी वापर सोसायट्या आहेत. मागील आठवड्यात पालकमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व धरण समूहाचे पाणी वाटप, आरक्षण जाहीर झाले; मात्र पालखेड पाणी वाटपाच्याबाबतीत पालकमंत्री, जलसंपदा खाते,लोकप्रतिनिधी यांनी मौन धारण केल्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. पालखेड धरण समूहातील पालखेड, करंजवण, वाघाड ही तिनही धरणे पुर्ण क्षमेतेने भरल्यास ८ हजार ५२४ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध होतो; मात्र यंदा अल्प पावसामुळे तीनही धरणाचा पाणीसाठा ५० टक्केपेक्षा कमी आहे. येवल्यातील शेतकऱ्यांना पुर्ण जाणीव आहे. तरीही आजमितीस ४ हजार २४४ दशलक्ष घनफूट इतका पाणी धरण समूहात शिल्लक असून त्यातून नियमित आवर्तनासोबत तालुक्यातील कालवा आणि वितरीका लगतचे बंधारे भरून द्यावेत अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे, ज्येष्ठ नेते तात्या लहरे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, संभाजी ब्रिगेडचे पडवळ यांच्यासह शेतकरी करीत आहे.पालखेड धरण समूहातील पाणी वाटप लवकरात लवकर जाहीर करावे व १५ डिसेंबर च्या आत आवर्तन मिळाले नाही तर उद्रेक होईल अशी स्थिती येवला तालुक्यात आहे. समूहातील सर्वात मोठ्या करंजवण धरणातील साठवण क्षमता ५ हजार ३७१ दशलक्ष घनफूट असली तरी आजमितीस धरणात केवळ २ हजार १२३ दशलक्ष घनफूट पाणी आहे. म्हणजे धरण ४० टक्केदेखील भरलेले नाही. त्याखालोखाल वाघाड धरणाची क्षमता २५०३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. केवळ १४९७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६० टक्के पाणी आहे. पालखेड धरणच मुळात छोटे आहे आहे आणि ७५९ दशलक्ष घनफूट आणि आजमितिस पाणी साठा आहे ६२४ दशलक्ष घनफूट आहे.एकूण धरण समूहाचा विचार करता ८५२४ दशलक्ष घनफूट संपूर्ण साठवण क्षमतेपैकी आजमितीस केवळ ४२४४ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा आहे. अर्थात फक्त ४९ टक्के सरासरी सर्व धरणे अर्धीही भरलेली नाहीत.येवला शहर, मनमाड शहर, मनमाड रेल्वे, पिंपळगाव बसवंत, ओझर आदि शहराना तसेच येवला तालुक्यातील ३८ गाव सारख्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नियमित २ आवर्तने देण्यात येणार असून शेतीसाठी पाणी दिल्यास येत्या मार्च, एप्रिल, मे, आणि जून महिन्यात पिण्यासाठीसुद्धा पाणी शिल्लक राहणार नाही असा तर्क लावला जात आहे.पालखेडच्या एका नियमित आवर्तनास ७५० दशलक्ष घनफूट पाणी लागते. येवला शहरासाठी दोन्ही तलावात किमान ५० दशलक्ष घनफूट पाणी, मनमाड शहरासाठी पाटोदा तलावातून ५१ दशलक्ष घनफूट पाणी, निफाड व विंचूर साठी १०० दशलक्ष घनफूट पाणी, रेल्वेसाठीचे ५० दशलक्ष घनफूट पाणी, ३८ गाव योजनेसाठी ४५ दशलक्ष घनफूट पाणी यासारख्या ३५० दशलक्ष घनफूट पाणी जर पोहोचवायचे असेल तर कमीत कमी ७०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडावे लागते. २५ टक्के वहन व्यय असून आणि शेतकऱ्यांद्वारे डोंगळेसह अनधिकृत पाणी उचलण्याचे प्रमाण फार मोठे आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्त, वीज बंद करणे, महसूल तसेच जलसंपदाचे शेकडो कर्मचारी रात्रंदिवस पहारा देऊनही शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे होणाऱ्या उपशाला नियंत्रणात आणणे अशक्य आहे. जलसंपदा खात्याला नियमित कराराची उद्दिष्ट्ये पूर्ण झाल्यावर पाणी उरल्यास शेतकऱ्यांना द्यायचेच असते. परंतु कालव्याच्या वरील बाजूस असणारे बलदंड बागायतदार शेतकरी येन-केनप्रकारे आपली मोठ मोठी शेततळी भरून घेत असतात. (वार्ताहर)