शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

गारपीटग्रस्तांच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळेना शेतकरी हवालदिल : ७६ कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: February 5, 2015 22:51 IST

गारपीटग्रस्तांच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळेना शेतकरी हवालदिल : ७६ कोटींची प्रतीक्षा

  नाशिक : सप्टेंबर २०१४ ते डिसेंबर २०१४ दरम्यान जिल्'ात चारवेळा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना द्यावयाची ७६ कोटींची नुकसानभरपाई पोटीची रक्कम शासनाकडे वारंवार मागूनही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून, जवळपास तीन वेळा शासनाकडे मागणी करूनही अद्याप प्रस्तावानुसार नुकसानभरपाईची रक्कम अद्याप अप्राप्त असल्याची कबुली दिली आहे. मागील वर्षी सप्टेंबरपासूनच गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्'ातील खरिपाचे व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विशेषत: काढणीला आलेल्या खरीप कांद्यासह द्राक्ष व डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुसार नुकसान झालेल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकांचे पंचनामे करून त्यानुसार कृषी विभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे नुकसानभरपाईपोटी निधीची मागणी केली होती. ५० टक्क््यांपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झालेल्या नुकसानभरपाईची महिनानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - सप्टेंबर २०१४- २४ कोटी ५० लाख, आॅक्टोबर २०१४- २ कोटी २० लाख, नोव्हेंबर २०१४- १८ कोटी ९३ लाख, डिसेंबर २०१४- ३१ कोटी अशी एकूण चार टप्प्यांत झालेल्या नुकसानभरपाई पोटीची ७६ कोेटी ६३ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. प्रत्यक्षात तीन वेळा या नुकसानभरपाईपोटी प्रस्ताव पाठवूनही अद्याप नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, खरिपाच्या हंगामात काय करावे? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ही नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत टंचाईसाठी १५० कोटींची मदत जिल्'ाला प्राप्त झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)