शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

गारपीटग्रस्तांच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळेना शेतकरी हवालदिल : ७६ कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: February 5, 2015 22:51 IST

गारपीटग्रस्तांच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळेना शेतकरी हवालदिल : ७६ कोटींची प्रतीक्षा

  नाशिक : सप्टेंबर २०१४ ते डिसेंबर २०१४ दरम्यान जिल्'ात चारवेळा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना द्यावयाची ७६ कोटींची नुकसानभरपाई पोटीची रक्कम शासनाकडे वारंवार मागूनही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून, जवळपास तीन वेळा शासनाकडे मागणी करूनही अद्याप प्रस्तावानुसार नुकसानभरपाईची रक्कम अद्याप अप्राप्त असल्याची कबुली दिली आहे. मागील वर्षी सप्टेंबरपासूनच गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्'ातील खरिपाचे व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विशेषत: काढणीला आलेल्या खरीप कांद्यासह द्राक्ष व डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुसार नुकसान झालेल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकांचे पंचनामे करून त्यानुसार कृषी विभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे नुकसानभरपाईपोटी निधीची मागणी केली होती. ५० टक्क््यांपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झालेल्या नुकसानभरपाईची महिनानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - सप्टेंबर २०१४- २४ कोटी ५० लाख, आॅक्टोबर २०१४- २ कोटी २० लाख, नोव्हेंबर २०१४- १८ कोटी ९३ लाख, डिसेंबर २०१४- ३१ कोटी अशी एकूण चार टप्प्यांत झालेल्या नुकसानभरपाई पोटीची ७६ कोेटी ६३ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. प्रत्यक्षात तीन वेळा या नुकसानभरपाईपोटी प्रस्ताव पाठवूनही अद्याप नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, खरिपाच्या हंगामात काय करावे? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ही नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत टंचाईसाठी १५० कोटींची मदत जिल्'ाला प्राप्त झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)