शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या पुलाला दुुरुस्तीची प्रतिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:11 IST

मनमाड : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रामगुळणा पांझण नदिला आलेल्या पुरामुळे बुरकुलवाडी भागाकडे जाणारा फरशी पुल तुटल्याने या भागातील नारिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.त्यानंतर या पुलाची मुरूम टाकुन किरकोळ डागडुजी करण्यात आली असली तरी सदरचा तुटलेला पुल आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.

ठळक मुद्देमनमाड : विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांचे हाल

मनमाड : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रामगुळणा पांझण नदिला आलेल्या पुरामुळे बुरकुलवाडी भागाकडे जाणारा फरशी पुल तुटल्याने या भागातील नारिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.त्यानंतर या पुलाची मुरूम टाकुन किरकोळ डागडुजी करण्यात आली असली तरी सदरचा तुटलेला पुल आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.गेल्या वर्षी पांझण रामगुळणा नदिला आलेल्या पुरामुळे शहरात मोठे नुकसान झाले होते. या मधे एचएके हायस्कुलच्या मागच्या बाजुला शहरातून बुरकुलवाडी, किर्तीनगर, सिकंदर नगर, माउली नगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला जोडणारा फरशी पुल तुटला होता. या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने पुलाची दुरावस्था झाली होती.या भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.मुख्याता या भागातून एचएके हायस्कुल कडे मोठया प्रमाणात विद्यार्थी येत असतात. हा पुल तुटल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारून महामार्गाने गावाकडे यावे लागत होते. या मुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता झाल्याने नागरिकांकडून या पुलाच्या दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती.या बाबद वारंवार तक्रारी करूनही संबंधीत यंत्रणेने केवळ मुरूम टाकून तात्पूरती डागडुजी केली होती. यामुळे पुलावरून वहातूक सुरू झाली असली तरी तुटलेल्या पुलावरून चालतांना नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.शाळा सुटल्यानंतर सिकंदर नगर कडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची या पुलावर गर्दी होत असते.पुलाची सध्याची अवस्था पहाता पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते.दरम्यान तीस ते पस्तीस वर्षांपुर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाची सध्या दुरावस्था झाली असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या पुलाची उंची वाढउन दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालीद शेख यांच्या नेतृत्वाखाली या भागातील अनेक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार करूनही हा पुल दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने नागरिकांकडून सांताप व्यक्त करण्यात येत आहे.मनमाडला विसर्जनासाठी सहाठिकाणी मुर्ती संकलन केंद्रमनमाड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता गणपती विसर्जनाच्या दिवशी गर्दी होउ नये या साठी पोलीस तसचे पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात पाच ठिकाणी मुर्ती विसर्जन कुंड सहा ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहे.नागरिकांनी सोयीनुसार मुर्ती विसर्जन करावे अथवा संकलन केंद्रात मुर्ती देण्यात यावी असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.विसर्जन करण्यासाठी येणाºया नागरिकांना मास्क व सॅनीटायझर वापरणे बंंधनकारक करण्यात आले आहे. शहरात गणेशकुंड दत्त मंदिर रोड, ट्रेनिंग कॉलेज जवळ, बुरकुलवाडी, बुधलवाडी व शिक्षक कॉलनी तात्पुरते गणेश कुंड या सहा ठिकाणी मुर्ती विसर्जन करता येणार आहे.तर पोलीस परेड ग्राउंड, शाळा क्रमांम १४, आंबेडकर नगर प्राथमिक शाळा, विवेकानंद नगर गणपती मंदिर, शांतीनगर, रेल्वे इंस्टीट्यूट या सहा ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्र करण्यात आले आहे.नागरिकांनी घरूनच आरती करून मुर्ती विसर्जनासाठी आनणे आवश्यक आहे.विसर्जनाच्या वेळी कुठलेही पारंपारीक ,देशी, विदेशी वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत विसर्जनाची वेळ देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग