शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाघरान भकास : वनाधिकारी अन् लाकूड तस्करांची अभद्र युती, वनतळ्यांना गळती वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:00 IST

सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : डावखल जंगल नव्वदच्या दशकात बागलाण तालुक्यातील डावखल या सागाच्या जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगणारे आदिवासी बांधव आजही आहेत.

ठळक मुद्देरस्ते बनले तस्करीचे मार्गवन्यजिवांचा जीव धोक्यात

सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : डावखल जंगल नव्वदच्या दशकात बागलाण तालुक्यातील डावखल या सागाच्या जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगणारे आदिवासी बांधव आजही आहेत; मात्र वनाधिकारी आणि लाकूड तस्कर यांच्या अभद्र युतीमुळे झालेल्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्याचा जीव धोक्यात आल्याचे चित्र पश्चिम भागातील राखीव जंगलात निदर्शनास आले. एकेकाळी बागलाण हे पट्टेदार वाघांचा अधिवास असलेले वाघरान म्हणून ओळखले जात होते. विकासाच्या नावाने जंगलात वृक्ष तोडून झालेले रस्ते बनले तस्करीचे मार्ग, मानवाने जंगलावर केलेले अतिक्र मण यामुळे मानवी वस्तीत होणारा वन्यप्राण्यांचा शिरकाव, लाखो रुपये खर्चून बांधलेल्या वनतळ्यांना लागलेली गळती या सर्वांचा एकत्रित परिणाम वन्यजिवांच्या नैसर्गिक अधिवासावर झाला आहे. वृक्षतोड आणि वनतळ्यांना लागलेल्या गळतीमुळे सावज आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या बिबट्याला कधी विहिरीत पडून स्वत: शिकार होतो तर कधी बिबट्या कीटकनाशक फवारण्याच्या टाकीतले पाणी पिऊन जीव गमवावा लागत आहे. तर मोरांचीदेखील हीच अवस्था. ससे, तितर, बटेर, लाव्या ,कोल्हे, रानडुक्कर यांची राजरोज शिकार केली जाते. यामुळे वन्यजिवांचा जीव धोक्यात आला आहे. बागलाण तालुक्यात डावखल, केळझर, ततानी, बारीपाडा, मळगाव, भवाडे, तळवाडे, दसाने, केरसाने, दोधेश्वर, कोटबेल, लखमापूर, चौगाव, चिराई, महड , राहूड, बिलपुरी, रातीर, टिंगरी, पिसोळ, नंदिन, दरेगाव, लाडूद, पारनेर, ढोलबारे, आव्हाटी, कौतिकपाडे, मुल्हेर, जाखोड, बोर्हाटे या परिसरात राखीव वनक्षेत्र आहे. या भागात दरवर्षी बेडा, आवळा, सीताफळ, साग, चिंच, बांबू आदी प्रकारच्या हजारो वृक्षांची गेल्या चार दशकांपासून दरवर्षी लागवड होते मात्र आजही बहुतांश डोंगर बोडकेच बघायला मिळत असल्यामुळे ही लागवड कागदावरची राहिल्याचे चित्र बागलाण मध्ये बघायला मिळते. याला सरकारी बाबू आण िलोकप्रतिनिधी ही जोडगोळी देखील कारणीभूत असल्याचे जाहीरपणे बोलले जाते.लोकप्रतिनिधी आण िसंबधित सरकारी यंत्रणेचा महिना दोन महिन्यात नक्कीच आढावा घेतला जातो.