शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

वाघाडी नाल्याला संरक्षक भिंतीची गरज

By admin | Updated: June 10, 2016 22:48 IST

वाघाडी नाल्याला संरक्षक भिंतीची गरज

नाशिक : पंचवटीतील दिंडोरी रोडवरील कलानगर मागे असलेल्या निसर्गनगर येथे रस्ते, पथदीप, स्वच्छता अशा कोणत्याही सुविधा नाहीत. त्यातच या भागातील वाघाडी नाल्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि प्रदूषणाचा वाढता त्रास आहे. पावसाळ्यात नाल्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता नाल्याला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दिंडोरी रोडवरील हा भाग नवविकसित आहे. परंतु अत्यंत समस्याग्रस्त आहे. परिसरात कलानगर ते निसर्गनगर दरम्यान वाघाडी नाला असून, त्यात गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे. तसेच नागरिक येथे कचरा आणून टाकतात. या भागात अनेक नवी बांधकामे सुरू असून, तेथील मजूर या नाल्याजवळ उघड्यावरच प्रातर्विधी करतात. त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचा त्रास नागरिकांना होतो. एकीकडे महापालिका शहर हगणदारीमुक्त करीत असताना या भागाकडे मात्र दुर्लक्ष आहे. वाघाडी नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यानंतर आसपासच्या परिसरात पाणी शिरते. वाघाडी नाला नैसर्गिक असला तरी तो बुजवण्याचे काम सध्या काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. त्यामुळे पात्राचा संकोच झाल्याने पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने या नाल्याला संरक्षक भिंत बांधावी तसेच नाल्यावरील पुलाला संरक्षक कथडे बांधावे आणि या मार्गावर पथदीप बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)