शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

कोरोनो संकटातही बॉश कंपनीत वेतन वाढ ; २३० हंगामी कामगारांना कायम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 19:44 IST

कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असताना नाशिकमधील सातपूर औद्योगित वसाहतीतील बॉश कंपनीने कामगारांना घसघशीत वेतनवाढ दिली देत सुखद धक्का दिला आहे. कंपनी व्यस्थापन आणि कामगार संघटना यांच्तील करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्यात येणार असून कामगारांना ४० महिन्यांचा फरकही मिळणार आहे.

ठळक मुद्देबॉश कंपनीत वेतन वाढीचा करार  ४० महिन्यांपासून प्रलंबीत करारावर स्वाक्षऱ्या 230 हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय

नाशिक : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून कामगारांवर आसमानी संकट कोसळले असतांना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. या करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अशा संकट काळातही २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार असल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कामगार व व्यावस्थापनामध्ये गेल्या ४० महिन्यांपासून हा करार प्रलंबित होता. दीड महिन्यांपूर्वी नवीन युनियन पदाधिकाऱ्यांनी कराराची बोलणी पुढे चालू ठेवत कंपनीचे स्थानिक व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांच्यात सकारात्मक बोलणी झाल्यानंतर रविवारी  (दि.३) उभय पक्षांनी अंतिम करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार साडेसात हजार रुपये वेतनवाढ आणि सात टक्के उत्पादन वाढ दिल्यानंतर अडीच हजार (व्हेरिएबल बास्केट) असे दहा हजार रुपये दरमहा कामगारांना मिळणार आहेत. त्यासोबतच सीपीआय डी लिंकिंगचे तीन हजार रुपये वेगळे मिळणार आहेत. दि.१ जानेवरी २०१७ रोजी हजेरी पटावर असलेल्या सर्व कायम कामगारांना ही वेतनवाढ मिळणार असून दि.३ मे पासून १३० हंगामी कामगार कायम होणार आहेत.  पुढील सहा महिन्यात उर्वरित शंभर हंगामी कामगार कायम होतील, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी दिली. या करारावर कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन, उपाध्यक्ष मुकुंद भट, मनुष्यबळ महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, तसेच सतीश कुमार,जतीन सुळे,तमाल सेन,शरद गीते यांच्यासह युनियनकडून अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, सहचिटनीस हरिभाऊ नाठे,  विनायक येवला, खजिनदार नंदू अहिरेआदिंनी स्वाक्षऱ्या केल्या. ४० महिन्यांचा फरक मिळणार व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करुन केवळ पैसे न पाहता भविष्यकाळाचा विचार केला.नाशिकच्या कारखान्यात नवीन गुंतवणूक करण्याचे आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापनाने दिले आहे.  कामगारांना ४० महिन्यांचा फरक मिळणार आहे. करारामुळे कामगारांमध्ये विश्वासाचे आणि दिलासादायक वातावरण निर्माण होणार आहे.-अरुण भालेराव. अध्यक्ष बॉश कामगार संघटना.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकEmployeeकर्मचारी