शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

कोरोनो संकटातही बॉश कंपनीत वेतन वाढ ; २३० हंगामी कामगारांना कायम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 19:44 IST

कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असताना नाशिकमधील सातपूर औद्योगित वसाहतीतील बॉश कंपनीने कामगारांना घसघशीत वेतनवाढ दिली देत सुखद धक्का दिला आहे. कंपनी व्यस्थापन आणि कामगार संघटना यांच्तील करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्यात येणार असून कामगारांना ४० महिन्यांचा फरकही मिळणार आहे.

ठळक मुद्देबॉश कंपनीत वेतन वाढीचा करार  ४० महिन्यांपासून प्रलंबीत करारावर स्वाक्षऱ्या 230 हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय

नाशिक : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून कामगारांवर आसमानी संकट कोसळले असतांना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. या करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अशा संकट काळातही २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार असल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कामगार व व्यावस्थापनामध्ये गेल्या ४० महिन्यांपासून हा करार प्रलंबित होता. दीड महिन्यांपूर्वी नवीन युनियन पदाधिकाऱ्यांनी कराराची बोलणी पुढे चालू ठेवत कंपनीचे स्थानिक व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांच्यात सकारात्मक बोलणी झाल्यानंतर रविवारी  (दि.३) उभय पक्षांनी अंतिम करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार साडेसात हजार रुपये वेतनवाढ आणि सात टक्के उत्पादन वाढ दिल्यानंतर अडीच हजार (व्हेरिएबल बास्केट) असे दहा हजार रुपये दरमहा कामगारांना मिळणार आहेत. त्यासोबतच सीपीआय डी लिंकिंगचे तीन हजार रुपये वेगळे मिळणार आहेत. दि.१ जानेवरी २०१७ रोजी हजेरी पटावर असलेल्या सर्व कायम कामगारांना ही वेतनवाढ मिळणार असून दि.३ मे पासून १३० हंगामी कामगार कायम होणार आहेत.  पुढील सहा महिन्यात उर्वरित शंभर हंगामी कामगार कायम होतील, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी दिली. या करारावर कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन, उपाध्यक्ष मुकुंद भट, मनुष्यबळ महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, तसेच सतीश कुमार,जतीन सुळे,तमाल सेन,शरद गीते यांच्यासह युनियनकडून अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, सहचिटनीस हरिभाऊ नाठे,  विनायक येवला, खजिनदार नंदू अहिरेआदिंनी स्वाक्षऱ्या केल्या. ४० महिन्यांचा फरक मिळणार व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करुन केवळ पैसे न पाहता भविष्यकाळाचा विचार केला.नाशिकच्या कारखान्यात नवीन गुंतवणूक करण्याचे आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापनाने दिले आहे.  कामगारांना ४० महिन्यांचा फरक मिळणार आहे. करारामुळे कामगारांमध्ये विश्वासाचे आणि दिलासादायक वातावरण निर्माण होणार आहे.-अरुण भालेराव. अध्यक्ष बॉश कामगार संघटना.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकEmployeeकर्मचारी