शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

वडनेरभैरव पोलिसांकडून १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:51 IST

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देआठ ताब्यात : ६७ शेतकऱ्यांना सव्वाकोटीची रक्कम परत

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यापासून फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे मिळाले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिघावकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे. वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून व्यापाऱ्यांकडे असलेले त्यांचे सुमारे एक कोटी २१ लाख रुपये परत करण्यात आले. पैसे परत करण्यास नकार देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिसांनी मदतीचा हात दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले आहे. दिघावकर व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल जिल्हाभरात कौतुक होत आहे.शेतकऱ्यांना पैसे परत न देणाऱ्या परराज्यातील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही व्यापाऱ्यांनी अवधी मागून घेतला आहे. द्राक्ष पिकासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व व्यापारी बांधावर येऊन माल घेत असल्याने सुरक्षेची हमी राहत नाही. शेतकरी विश्वास ठेवून परराज्यातील व्यापाऱ्यांना माल देत असतो, जर स्थानिक ग्रामपंचायतीकडून सुरक्षा म्हणून व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेतली, तर फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.-गणेश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव.

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी