शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

वडनेरभैरव पोलिसांकडून १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:51 IST

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देआठ ताब्यात : ६७ शेतकऱ्यांना सव्वाकोटीची रक्कम परत

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यापासून फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे मिळाले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिघावकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे. वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून व्यापाऱ्यांकडे असलेले त्यांचे सुमारे एक कोटी २१ लाख रुपये परत करण्यात आले. पैसे परत करण्यास नकार देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिसांनी मदतीचा हात दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले आहे. दिघावकर व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल जिल्हाभरात कौतुक होत आहे.शेतकऱ्यांना पैसे परत न देणाऱ्या परराज्यातील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही व्यापाऱ्यांनी अवधी मागून घेतला आहे. द्राक्ष पिकासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व व्यापारी बांधावर येऊन माल घेत असल्याने सुरक्षेची हमी राहत नाही. शेतकरी विश्वास ठेवून परराज्यातील व्यापाऱ्यांना माल देत असतो, जर स्थानिक ग्रामपंचायतीकडून सुरक्षा म्हणून व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेतली, तर फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.-गणेश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव.

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी