शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

वडनेरभैरव पोलिसांकडून १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:51 IST

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देआठ ताब्यात : ६७ शेतकऱ्यांना सव्वाकोटीची रक्कम परत

वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यापासून फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे मिळाले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिघावकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे. वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून व्यापाऱ्यांकडे असलेले त्यांचे सुमारे एक कोटी २१ लाख रुपये परत करण्यात आले. पैसे परत करण्यास नकार देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिसांनी मदतीचा हात दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले आहे. दिघावकर व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल जिल्हाभरात कौतुक होत आहे.शेतकऱ्यांना पैसे परत न देणाऱ्या परराज्यातील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही व्यापाऱ्यांनी अवधी मागून घेतला आहे. द्राक्ष पिकासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व व्यापारी बांधावर येऊन माल घेत असल्याने सुरक्षेची हमी राहत नाही. शेतकरी विश्वास ठेवून परराज्यातील व्यापाऱ्यांना माल देत असतो, जर स्थानिक ग्रामपंचायतीकडून सुरक्षा म्हणून व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेतली, तर फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.-गणेश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव.

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी