शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा कृती आराखड्याचा ‘उतारा’

By admin | Updated: September 26, 2015 23:21 IST

बैठक : राज ठाकरे यांचे संकेत

नाशिक : राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्या यासंदर्भात एकत्रित कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास मनसेच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे.नाशिक येथील मनसेच्या राजगड या कार्यालयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न नेमके काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे, पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्व वाहिनी नद्यांना जोडण्यात यावे, स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्केनफा देण्यात यावा, शेतकऱ्यांना सद्यस्थितीत बाजार भावानुसार कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे बाजार भावाच्या मूल्यांकनानुसार ३० ते ४० टक्केकर्ज मिळावे, ते तूर्तास अत्यल्प प्रमाणात मिळते, दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने एका समितीचे गठण करावे, यासह विविध मागण्यांचा उहापोह या बैठकीत झाल्याचे समजते. शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत? त्यांची उत्तरे शोधू व त्यानंतरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जन आंदोलन उभारू, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे समजते. यावेळी बैठकीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष जि. प. सदस्य संदीप पाटील, अ‍ॅड. रतनकुमार इचम, शांताराम जाधव, शेखर पवार यांनी प्रश्न मांडल्याचे कळते. बैठकीस अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष नगरसेवक राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शशिकांत जाधव, गटनेते अनिल मटाले, सलीम शेख, रमेश खांडबहाले, शरद शिंदे, मनोज ढिकले, दीपक पगार, हंसराज वडघुले, अतुल अहिरे, जगदीश अहिरे, डॉ. राजेंद्र शिरोडे, संदीप रौंदळ, राजेंद्र माळी, धोंडीराम बोरसे, मनोज सोनवणे, राकेश भामरे, कुंदन पाटील, अरुण दुगजे, जगन्नाथ गायकवाड, बबन जहागीरदार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)