शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा कृती आराखड्याचा ‘उतारा’

By admin | Updated: September 26, 2015 23:21 IST

बैठक : राज ठाकरे यांचे संकेत

नाशिक : राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्या यासंदर्भात एकत्रित कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास मनसेच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे.नाशिक येथील मनसेच्या राजगड या कार्यालयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न नेमके काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे, पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्व वाहिनी नद्यांना जोडण्यात यावे, स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्केनफा देण्यात यावा, शेतकऱ्यांना सद्यस्थितीत बाजार भावानुसार कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे बाजार भावाच्या मूल्यांकनानुसार ३० ते ४० टक्केकर्ज मिळावे, ते तूर्तास अत्यल्प प्रमाणात मिळते, दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने एका समितीचे गठण करावे, यासह विविध मागण्यांचा उहापोह या बैठकीत झाल्याचे समजते. शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत? त्यांची उत्तरे शोधू व त्यानंतरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जन आंदोलन उभारू, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे समजते. यावेळी बैठकीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष जि. प. सदस्य संदीप पाटील, अ‍ॅड. रतनकुमार इचम, शांताराम जाधव, शेखर पवार यांनी प्रश्न मांडल्याचे कळते. बैठकीस अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष नगरसेवक राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शशिकांत जाधव, गटनेते अनिल मटाले, सलीम शेख, रमेश खांडबहाले, शरद शिंदे, मनोज ढिकले, दीपक पगार, हंसराज वडघुले, अतुल अहिरे, जगदीश अहिरे, डॉ. राजेंद्र शिरोडे, संदीप रौंदळ, राजेंद्र माळी, धोंडीराम बोरसे, मनोज सोनवणे, राकेश भामरे, कुंदन पाटील, अरुण दुगजे, जगन्नाथ गायकवाड, बबन जहागीरदार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)