शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

पाच वर्षांपासून खोरीपाडा करतोय गिधाड संवर्धन

By admin | Published: September 02, 2016 11:17 PM

प्रजाती जतन : वनविभाग, आदिवासींच्या प्रयत्नाने राज्यातील एकमेव प्रकल्पाला यश

अझहर शेख नाशिकजगाच्या पाठीवर दुर्मिळ होत चाललेल्या गिधाड पक्ष्याचे संवर्धन नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील खोरीपाड्यात वनविभाग व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने यशस्वी होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पांढरी पाठ व लांब चोच असलेल्या दोन गिधाडांच्या प्रजाती जतन करण्यामध्ये आदिवासी बांधवांना निसर्गाची साथ लाभली आहे. अडीचशेहून अधिक गिधाडांची नोंद येथील ‘रेस्तरां’वर करण्यात आली आहे. ‘गिधाड रेस्तरां’मुळे खोरीपाड्याची अवघ्या महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण झाली आहे.आजच्या आधुनिक युगात भारतासह अमेरिका, दक्षिण आशिया व अन्य प्रदेशातील गिधाडांच्या विविध प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे निसर्गातील प्रदूषण रोखण्याचे अभूतपूर्व पर्यावरण संरक्षणाचे कार्य करणारी गिधाडे नामशेष होत असल्याने जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. गिधाडांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहे. जैवविविधतेमधील अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी गिधाडांच्या प्रजातींचे अस्तित्व तेवढेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्याच्या त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी दुर्गम भाग असलेल्या खोरीपाड्यात ग्रामस्थ व हरसूल वनविभागाने गिधाड संवर्धनाचा उपक्रम मागील पाच वर्षांपासून हाती घेतला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प चांगलाच यशस्वी झाला असून, यावर्षी जून महिन्यात दोन्ही प्रजातींच्या मिळून २५० गिधाडांची नोंद रेस्तरांवर करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. पंचक्रोशीत मृत झालेल्या प्राण्यांची माहिती ग्रामस्थ वनविभागाला देतात. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी वाहनामध्ये सदर प्राणी आणून त्याची वैद्यकीय तपासणी करतात. डायक्लोफिनॅक या वेदनाशामक औषधी द्रव्यांचे अंश प्राण्यांमध्ये नसल्याची खात्री पटल्यानंतरच सदर प्राण्याचे खाद्य गिधाड रेस्तरांवर उपलब्ध करून दिले जाते. २०११ साली वनविभाग नाशिकच्या वतीने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून खोरीपाडा येथे ‘गिधाडांचे उपाहारगृह’ हा प्रकल्प लोकसहभागातून साकारण्यात आला. तत्कालीन पश्चिम वनविभागाच्या वनसंरक्षक अनिता पाटील, हरसूल परिक्षेत्राचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य शंकर शिंदे यांनी यासाठी प्रयत्न करून खोरीपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.