शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

२२४ ग्रामपंचायतींसाठी मेमध्ये मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:20 AM

राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ३१८ रिक्त जागांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीदेखील सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ३१८ रिक्त जागांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीदेखील सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या, प्रभागनिहाय रचना व आरक्षणाची सोडत अशा विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. गेल्या आठवड्यात प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. ८ तालुक्यांतील २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत नामांकनाअभावी रिक्त जागांवर पोटनिवडणुका घेण्यासही आयोगाने हिरवा कंदील दर्शविल्यामुळे २०० ग्रामपंचायतींच्या ३१८ रिक्त असलेल्या जागांवरही ही निवडणूक घेण्यात येणार आहे....या ग्रामपंचायतींमध्ये होणार मतदाननाशिक- जलालपूर, गंगाम्हाळुंगी, महादेवपूर, पिंपळगाव (ग), त्र्यंबकेश्वर- सोमनाथनगर, साप्ते, मेटघर किल्ला, दिंडोरी- गवळवाडी, ननाशी, वनारवाडी, मालेगाव- मांजरे, कळवण- करंभेळ, देसगाव, खडकी, कोसवण, सरले दिगर, बागलाण- केरसाने, केळझर, भाक्षी, मुळाणे, देवळा- माळवाडी, फुलेमाळवाडी, मेशी, चांदवड- मंगरूळ. या ग्रामपंचायतींच्या ८१ प्रभागांत २१६ सदस्य व २४ सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे, तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींतील २६४ प्रभागांतील ३१८ रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.अचारसंहिता लागूआयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि. ७ मे ते १२ मे या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात येणार असून, दि. १४ मे रोजी छाननी, दि. १६ मे रोजी माघार व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार असून, २७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे व दुसºया दिवशी मतमोजणी करण्यात येईल. आयोगाने सोमवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्याने रात्री १२ वाजेपासून आचारसंहिता लागू केली असून, त्या त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ती अस्तित्वात राहील, असे नमूद केले आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा करण्यास लोकप्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत