शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी सरसावले सेवायोजनेचे स्वयंसेवक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 17:56 IST

सर्वतीर्थटाकेद : उन्हाळ्यात बहुतांशी ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ माणसांवर येते, तेव्हा पशू-पक्ष्यांची काय अवस्था होत असेल? नेमकी हिच अडचण लक्षात घेऊन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भंडारदरा परिसरातील सांदन दरीची स्वच्छता करून त्याठिकाणी वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करून भूतदयेचा एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

महाराष्ट्रातील काश्मीर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात निसर्गाचा अद्भुत नजारा म्हणून साम्रद येथील सांदन दरीला ओळखले जाते. टाकेदपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेली ही दरी अशिया खंडातील दुसºया क्रमांकाची दरी म्हणूनही परिचित आहे. अशा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या दरीचा आनंद घेण्यासाठी देश-परदेशातील पर्यटकांची सांदनदरीत नेहमीच गर्दी असते. पण या पर्यटकांमुळे येथे प्रचंड प्लॅस्टिकच्या बाटल्या,वेफर्स कागद, सिगारेटची पाकीटे, मद्याच्या बाटल्यांचा कचरा याठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो. तसेच दरवर्षी उन्हाळ्यात या सांदण दरी परिसरात पशू-पक्ष्यांना प्यायला पाणीही मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्राचार्य दिलीप रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली साम्रद व सांदण दरी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. साम्रदच्या रोहिदास बांडे या युवकांने सांदनदरीत कोणकोणत्या ठिकाणी पाणवठे करणे गरजेचे आहे याचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत सांदन दरीतील संपूर्ण कचरा दरीच्या वर आणत त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली . तसेच उन्हाळ्यात वन्यजीवांवर पिण्याचे पाणी शोधण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वयंसेवकांनी सांदणदरीत विविध ठिकाणी पाणवठे तयार केले. ते पाणी वाहून जाणार नाही याची दक्षताही घेतली. त्यामुळे उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना याठिकाणी पाणी पिता येईल व पाण्याअभावी त्यांची संख्याही घटणार नाही. नवीन पाहूणे पक्षी भंडारद-याच्या अभयारण्यात आश्रयास येतील हेच या स्वयंसेवकांनी शिबीराद्वारे दाखवून दिले. वनक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे, गुलाब दिवे, प्राचार्य रोंगटे, कार्यक्र म अधिकारी राजेंद्र चव्हाण, प्रा. महेश पाडेकर , प्रा.अनुसया वाळेकर, साम्रद येथील सरपंच मारु ती बांडे , उपसरपंच प्रा. त्र्यंबक बांडे, नामदेव बांडे, रोहिदास बांडे यांचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील ५० स्वयंसेवकांना ग्रामपंचायत साम्रद यांनी वनभोजनाचा आनंद दिला.

टॅग्स :Socialसामाजिक