शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:52 IST

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  वडाळागावात सुमारे ४५ वर्षांपूर्वी शेतीव्यवसाय होता. शेतकरी व हातावर काम करण्याची वस्ती म्हणून गावाची ओळख आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी शेतीला जसजसा भाव मिळत गेला तसतशी जमीन विकली गेली. गावात झीनतनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर यांसह विविध उपनगरे अस्तित्वात येऊन विस्तार वाढतच चालला आहे. सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले गाव असून, सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या तीस ते पस्तीसच्या घरात गेली आहे. प्रत्येक जनावरांच्या गोठ्यामध्ये सुमारे चारशे ते पाचशे जनावरे आहेत. त्या जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारकांनी सर्रासपणे जनावरांचे मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे. या संदर्भात महापालिकेला निवेदन देऊनसुद्धा अद्यापी जनावरांचे गोठे हटवले जात नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गावात विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाला होता त्यामुळे गावात रुग्णांची संख्या वाढली होती. असे असतानाही कोणती कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.पाणी रस्त्यावर वाहतेकाही गोठेधारकांनी मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिले आहे. हे नाले विविध कॉलनी आणि सोसायट्यांमधून जात असल्याने त्यातून घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी नाल्यात जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते.

टॅग्स :Healthआरोग्यNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका