शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहिनांना हवे शिक्षणात पाच टक्के आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:44 IST

दृष्टिहीन बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी दृष्टिहीन संघातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे. दृष्टिहिनांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाची असल्याने संघाची प्रगती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे राज्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण खापेकर यांनी केले.

पंचवटी : दृष्टिहीन बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी दृष्टिहीन संघातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे. दृष्टिहिनांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाची असल्याने संघाची प्रगती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे राज्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण खापेकर यांनी केले.तपोवनातील संत जनार्दन स्वामी आश्रम सत्संग सभागृहात राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे तेविसावे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी खापेकर कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शिरीष देशपांडे, महासचिव दत्तात्रय जाधव, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ बारड, नगरसेवक वर्षा भालेराव, धनंजय बेळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खापेकर यांनी पुढे सांगितले की, दृष्टिहीन बांधवांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना नवनवीन योजना लागू करून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तसेच शासकीय पातळीवर दृष्टिहीन बांधवांना रोजगार मिळवून देण्यासाठी संघाच्या माध्यमातून पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.यावेळी बारड यांनी उपस्थित दृष्टिहिनांना मार्गदर्शन केले. कायदा व कायद्याविषयी जाणीव अंध बांधवांना करून दिली पाहिजे. दृष्टिहीन बांधवांना शासकीय नोकरीत ४ टक्के आरक्षण आहे त्या जागा तसेच अनुशेष व्यवस्थित भरला जात नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेसाठी योगदान देणाºया ज्ञानेश्वर वडकर, पुष्पा खालकर, नवनाथ शेळके या कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भविष्यात संघाकडून जे प्रकल्प राबविले जातात त्यात आळंदी येथील जागृती शाळा व नाशिक औरंगाबाद औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांना अनुदान मिळविण्यासाठी संघातर्फे जनिहत याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी ज्ञानेश्वर मरडे, माणकेश्वर बढे, मनोज सुरडकर, प्रदीप लोंढे, जगजित कवाळ, मधुकर सूर्यवंशी, सीताराम बेडसे, सुरेखा धोंगडे, वर्षा कांबळे अरु णा आयनोर शकुंतला कडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव यांनी केले. सिद्धू बिराजदार यांनी आभार मानले.कारवाई करावीपाच टक्के उच्च शिक्षणात व ४ टक्के नोकरीत आरक्षण अंमलबजावणी व्हावी. उल्लंघन करणाºया व शासन निर्णय न पाळणाºया अधिकाºयांवर कारवाई व्हावी, अपंग व्यक्ती हक्क २०१६च्या अधिनियमातील प्रमुख कलमांची कारवाई केली जावी. सामाजिक सुरक्षितता आरोग्य व पुनर्वसनपर सवलती अंध बांधवांना द्याव्या, अंध-अपंगांना स्वयंरोजगारासाठी व प्रशिक्षणासाठी सर्व बँकांनी पतपुरवठा करावा, असे ठराव यावेळी मांडण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी