नाशिक- शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी करून मगच प्रवेश द्यावा, असे शासनाचे आदेश असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्या शासकीय कार्यालयांत अशी तपासणीच होत नसल्याने विशेषकरून जनसंपर्क असलेल्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मात्र धोका निर्माण झाला आहे.राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालयांना सर्व यंत्रणा कोरोना रोखणे तसेच कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कर्मचारी जुंपावे लागले आहेत. त्यांना कोरोना झाल्यानंतर शासकीय यंत्रणांना देखील कामकाजात अडथळे निर्माण होत होतात. शासकीय कार्यालयांत कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसह अनेक शासकीय कार्यालयांत फलक लावण्यात आले आहेत. मात्र, ते नावालाच असून प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक किंवा अन्य कोणतेही कर्मचारी येणाऱ्या नागरिकांना अशाप्रकारची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल मागत नाहीत. त्यामुळे शासकीय आदेश कागदावरच आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे सध्या नागरिकांशी संबंधित शासकीय कार्यालये आहेत, मात्र, तेथे नागरिक येताना अशाप्रकारे तपासणी होत नसल्याने अनेक शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.महापालिकेत नावालाच तटबंदीमहापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच आतील इमारतीच्या गेटवर देखील धातुशोधक दरवाजा तसेच बॅग स्कॅनिंग मशीनदेखील आहेत. येथे नागरिक कुठे जायये वगैरे दक्षतेने विचारतात. मात्र, कोराना चाचणी निगेटिव्ह असेल तरच प्रवेश दिला जाईल, असे बंधन नाही.जिल्हा परिषदेच्या गेटवरच फलकनाशिक जिल्हा परिषदेच्या गेटवरच फलक ह्यआरटीपीसीआर सक्तीचीह्ण असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, अडवण करण्यासाठी किंवा अहवाल तपासण्यासाठी कोणीच नाही असे आढळले आहे.शहरातील पोलीस ठाण्याच्या बाबतीतही असेच निदर्शनास आले. तक्रार करणे किंवा अन्य कामांसाठी येणाऱ्या कोणालाही अडकाठी नाही. किंबहुना अशाप्रकारचे ह्यआरटीपीसीआर सक्तीचेह्ण फलक देखील लावलेले नाहीत.
आरटीपीएसआर अहवाल न तपासताच अभ्यागतांनाच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:30 IST
नाशिक- शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी करून मगच प्रवेश द्यावा, असे शासनाचे आदेश असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्या शासकीय कार्यालयांत अशी तपासणीच होत नसल्याने विशेषकरून जनसंपर्क असलेल्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मात्र धोका निर्माण झाला आहे.
आरटीपीएसआर अहवाल न तपासताच अभ्यागतांनाच प्रवेश
ठळक मुद्देशासकीय कार्यालय: फलक नावालाच, कर्मचाऱ्यांना वाढला संसर्गाचा धोका