शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

जिल्ह्यातील वीरपत्नींचा संघर्ष सुरूच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:12 IST

आज स्वातंत्रदिन. पहाटपासून ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘मेरे देश की धरती’, ‘देखो वीर जवानो अपने ’ देशभक्तीपर गीते ऐकून, दूरचित्रवाणीवर शौर्यगाथा पाहून आपले मन अभिमानाने भरून जाईल. शहिदांच्या कहाण्या पाहताना डोळे ओलावतील.

नाशिक : आज स्वातंत्रदिन. पहाटपासून ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘मेरे देश की धरती’, ‘देखो वीर जवानो अपने ’ देशभक्तीपर गीते ऐकून, दूरचित्रवाणीवर शौर्यगाथा पाहून आपले मन अभिमानाने भरून जाईल. शहिदांच्या कहाण्या पाहताना डोळे ओलावतील. पण हे सारे एवढ्या दिवसापुरतेच सिमित रहाते. प्रत्यक्षात शहीद जवानांच्या वीरपत्नी, त्यांचे कुटुंबीय मुलभूत सुविधा, हक्काच्या लाभासाठी सरकार दरबारी चकरा मारून थकत आहेत. शहीद जवानांच्या विधवा आज पतीच्या पश्चात मिळालेल्या सरकारी निधीवर दावा सांगत सासरच्यांनी घराबाहेर काढल्याने जीवनाशी झगडा देत आहेत. परीक्षा देत नोकऱ्यांसाठी आणि पर्यायाने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी झगडत आहेत, चिमुकल्यांच्या शाळाप्रवेशासाठी, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मोलमजुरी करून कशी बशी पोटाची खळगी भरत आहेत. अशा या वीरपत्नींच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न...उच्चशिक्षित वीरपत्नी नोकरीच्या शोधात...पूर्वीच्या काळी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. साहजिकच अल्पशिक्षित वीरपत्नींना पती निधनानंतर विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र हल्ली बहुतांश जवानांच्या पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा अशा विविध क्षेत्रांत पदवी ते पदव्युत्तरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. अशा या वीरपत्नींच्या ज्ञानाचा शासनाने उपयोग करून घ्यावा, त्यांना नोकºया, व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.जिल्ह्यात ३००च्या वर वीरपत्नी असून, त्यांना पती निधनानंतर शासकीय मदतीसाठी, त्यांच्या कागदपत्र पूर्ततेसाठी, पूर्ण झालेल्या फाईल टेबलांवर फिरत असल्याने केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे. संगमनेरजवळील एका छोट्या खेड्यात राहणाºया ममता यांचे पती शत्रुशी दोन हात करताना शहीद झाले. त्यांना अनुक्रमे ५ व ८ वयाची मुले आहेत. पती गेले तेव्हा सगळेच सहानुभुती दाखवत होते, पण नंतर मात्र ममता यांना मिळणारे लाभ पाहून नातेवाईक, मित्रमंडळी अनावश्यक सल्ले देऊ लागले, चुकीचे मार्गदर्शन करू लागले. पती शहीद झाल्यानंतर ज्या हक्काच्या गोेष्टी मिळायल्या हव्यात त्या तर मिळाल्या नाहीच, पण सध्या त्यांना अनेक गोेष्टींना तोंड देत मुलांना वाढवावे लागत आहे. सटाण्याजवळील एका छोट्या खेड्यातील लहाने यांचे पती १२ वर्षांपूर्वी शहीद झाले. शासनाने त्यांना दोन गुंठे जमीन देण्याचे जाहीर केले. आज या घटनेला दहा वर्षे होऊन गेले तरी अद्याप त्यांना जमिनीचा तुकडाही मिळालेला नाही. त्यांची त्या जमिनीसंदर्भातली फाइल गावातून मंत्रालयात, मंत्रालयातून परत गावात फिरते आहे. हा प्रवास कधी संपेल आणि लहाने यांना ती जमीन कधी मिळेल याचे उत्तर कोणाकडेच नाही.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस